विशेष प्रतिनिधी
रांची: चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय येत्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय सुनावणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह ११० जणांवर या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेले आहेत.Lalu Prasad Yadav’s fodder scam probe completed, verdict to be announced on February 15
दुमका कोषागार प्रकरणात लालू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ते १९ मार्च २०१८ पासून कारागृहात शिक्षा भोगत होते. गेल्या १७ एप्रिल रोजी त्यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर प्रत्यक्षात ३० एप्रिल रोजी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती.
आता चारा घोटाळ्यातीलच डोरंडा कोषागार प्रकरणाचा निकाल येणार असल्याने लालूंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेष सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. त्यानंतर कोटार्ने निर्णय राखून ठेवत १५ फेब्रुवारी ही तारीख निकालासाठी निश्चित केली.
या प्रकरणात लालूप्रसाद यांच्यासह जगदीश शर्मा, डॉ. आर. के. शर्मा, ध्रुव भगत, पाच आयएएस अधिकारी, ३० पशु वैद्यकीय अधिकारी, सहा लेखापाल, ५६ पुरवठादार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या कोषागारात १३९.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून सीबीआयने सुरुवातीला १७० जणांवर गुन्हा दाखल केला होता.
त्यातील १४७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. २६ वर्षांपासून हा खटला सुरू असून बिहारचे माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ३७ आरोपींचे आतापर्यंत निधन झाले आहे.रांची येथील सीबीआय कोर्टात लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध चारा घोटाळा प्रकरणी पाच वेगवेगळे दावे दाखल करण्यात आले होते.
त्यातील चार खटल्यांचा निकाल लागला असून सर्वच प्रकरणात लालूंना शिक्षा सुनावली गेली आहे. आता पाचव्या आणि अंतिम खटल्याच्या निकालाची तारीख आज निश्चित झाली आहे. हे सर्वात मोठे प्रकरण असून लालूंना दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाणार की दिलासा मिळार हे आता १५ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.
Lalu Prasad Yadav’s fodder scam probe completed, verdict to be announced on February 15
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : राज्यसभेच्या सदस्यांसाठी आचारसंहिता जाहीर, कामकाज सुरळीत चालण्यासाठी लागू होणार हे नियम, वाचा सविस्तर…
- पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!
- टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या सूचना : प्रीपेड मोबाइल ग्राहकांना रिचार्जची वैधता २८ ऐवजी ३० दिवस द्यावी लागेल
- राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? मानहानीच्या खटल्याची ठाण्यातील न्यायालयात दररोज होणार सुनावणी