• Download App
    Kantaras Rishabh Shettyराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी 'कांतरा'चा ऋषभ शेट्टी

    Kantaras Rishabh Shetty : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी ‘कांतरा’चा ऋषभ शेट्टी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

    Kantaras Rishabh Shetty

    मनोज बाजपेयी आणि अरिजित सिंग यांचाही यादीत समावेश


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार) आज जाहीर झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात आले आहेत, ज्यांना सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केले आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार म्हटला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार सर्व कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी एक मोठी उपलब्धी मानली जाते.



    यावेळी दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीची  ( Rishabh Shetty ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे. कांतारा सारखा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 2022 मध्ये दिला गेला. या चित्रपटात ऋषभ शेट्टीने दमदार अभिनय केला आहे. तर साऊथच्या नित्या मेननने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. तिरुचित्रंबलम या चित्रपटातील चमकदार अभिनयासाठी नित्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. नित्यासोबत अभिनेत्री मानसी पारेख हिलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

    गुलमोहरला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा (हिंदी) पुरस्कार मिळाला आहे. तसेच या चित्रपटासाठी ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांचाही विशेष उल्लेख झाला आहे. ब्रह्मास्त्र गाण्यासाठी अरिजित सिंगला सर्वोत्कृष्ट गायकाचा (पुरुष) राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ब्रह्मास्त्रमधील अरिजित सिंगची देवा-देवा आणि केसरिया ही गाणी ब्लॉकबस्टर हिट ठरली.

    Kantaras Rishabh Shetty won the Best Actor for the National Film Awards

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार