वृत्तसंस्था
श्रीनगर : देशविरोधी लेख लिहिल्याबद्दल जम्मूच्या एका न्यायालयाने पत्रकार आणि रिसर्च स्कॉलरवर आरोप निश्चित केले आहेत. त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. एनआयए कायद्यांतर्गत नियुक्त केलेले विशेष न्यायाधीश अश्विनी कुमार यांनी गुरुवारी आरोप निश्चित केले.Journalist accused Under UAPA, writing anti-national articles and terror funding in Jammu
याप्रकरणी पत्रकार पीरजादा फहाद शाह आणि काश्मीर विद्यापीठाचा स्कॉलर अब्दुल अला फाजिली यांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल फाजिली याने ‘गुलामीच्या बेड्या तुटतील’ असा लेख लिहिला. हा लेख पत्रकार फहाद शाहने त्याच्या ‘द काश्मीर वाला’ या वेबसाइटवर प्रकाशित केला आहे.
लेखांद्वारे दहशतवादाला प्रोत्साहन
या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, दोघेही आपल्या लेखांद्वारे दहशतवादाला प्रोत्साहन देत होते. दहशतवाद्यांचे गौरव करण्यासाठी हे माध्यम वापरले जात होते. त्यांना जम्मू-काश्मीरमधील तरुणांना जहालवादाच्या मार्गावर ढकलायचे होते. त्यांना फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त करायचे होते.
हे लोक दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांच्या बाजूने भारतविरोधी कुभांड रचत होते. यासाठी त्यांना परदेशी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांकडून निधी मिळत असे. आरोपी सीमेपलीकडून फुटीरतावाद्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचा अनेक स्थानिक दहशतवाद्यांशीही संबंध होता.
जम्मू-काश्मीरची राज्य तपास यंत्रणा (एसआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एसआयएला या प्रकरणाची माहिती मिळाली. एसआयएने गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात चार्टशीट दाखल केले होते.
एसआयएचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सांगितले की आरोपीविरुद्ध गोळा केलेले पुरावे पुरेसे आहेत. यावरून आरोप निश्चित करण्यात आले.
Journalist accused Under UAPA, writing anti-national articles and terror funding in Jammu
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांनी केले भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन
- Balaghat Plane Crash : मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये चार्टर्ड विमान कोसळले; पायलट आणि को-पायलट ठार
- न्यायव्यवस्थेवर सरकारचा कोणताही दबाव नाही; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले
- महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीत जागावाटपाच्या अद्याप चर्चाही नाहीत, पण माध्यमांनी ठिणग्या टाकून पेटवले वणवे!!