• Download App
    Mizoram-Assam Dispute : संयुक्त निवेदनात म्हटले - मिझोरामला न जाण्याचा सल्ला मागे घेणार आसाम । Joint Statment On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions

    Mizoram-Assam Dispute : दोन्ही राज्यांच्या संयुक्त निवेदनात शांततेची ग्वाही, मिझोरामला न जाण्याचा सल्ला आसाम घेणार मागे

    Mizoram-Assam Dispute : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले. Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मिझोराम आणि आसामदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान, दोन्ही राज्य सरकारांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. यात संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्यात आला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मिझोराम आणि आसामने सीमा विवादांवर चर्चा केली आणि हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचे मान्य केले. यासह मिझोरामला प्रवास न करण्यासंबंधी पूर्वी दिलेला सल्ला आसाम सरकार मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

    आसाम आणि मिझोराम यांनी त्यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, गृहमंत्रालय आणि दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमेवरील तणाव संपवण्यासाठी आणि चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढण्यासाठी उचललेल्या पावलांवर ते पुढे जातील. संयुक्त निवेदनात, आसाम आणि मिझोराम यांनी आंतरराज्य सीमेवरील भागात शांतता राखण्यासाठी सहमती दर्शविली आहे. दोन्ही राज्ये संघर्षाच्या ठिकाणी गस्तीसाठी पोलीस दल पाठवणार नाहीत. यासह तेथे अतिरिक्त सैन्य तैनात केले जाणार नाही.

    26 जुलै रोजी रक्तरंजित संघर्ष

    दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा विवादाने 26 जुलै रोजी रक्तरंजित संघर्षाचे रूप धारण केले होते. ज्यामध्ये आसामचे 6 पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक ठार झाला होता, तर सुमारे 50 लोक जखमी झाले होते. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी बुधवारी ट्विटरद्वारे सांगितले की, दोन्ही राज्यांच्या बैठकीत तोडगा निघेल अशी आशा आहे.

    त्यांनी ट्विट केले, “उद्या 5 ऑगस्ट 2021 रोजी आसाम सरकारचे प्रतिनिधी एका वरिष्ठ मंत्र्याच्या नेतृत्वाखाली मिझोराम सरकारच्या शिष्टमंडळाला भेटतील. मला खात्री आहे की, यामुळे सीमा विवाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचा करार होईल.

    Joint Statement On Mizoram Assam Dispute says will find solutions through discussions

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार