विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेले जेएनयूचे विद्यार्थी नताशा नरवाल, देवांगणा कलिता आणि जामिया मिलिया इस्लामियाचा विद्यार्थी आसिफ इक्बाल तान्हा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.JNU students get bail after one year
बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यान्वये त्यांना अटक करण्यात आली होती. या तिघाजणांना मागील वर्षी मे महिन्यामध्ये अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने या दोघांनाही जामीन नाकारला होता, ते आदेश मात्र उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले.
या सर्व आरोपींना कोणत्याही प्रकारच्या बेकायदा कारवाईमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला असून जो पत्ता तुरुंगाच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे, तिथेच वास्तव्य करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेन. मागील वर्षी २४ फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्यावरून झालेल्या हिंसाचारामध्ये ५३ जण ठार झाले होते तर २०० जण जखमी झाले होते.
JNU students get bail after one year
महत्त्वाच्या बातम्या
- चीनविरुद्धच्या संघर्षात धारातीर्थी पडलेले हुतात्मा संतोष बाबूंचा सूर्यापेटमध्ये पुतळा
- बांगलादेशने भारतासमवेतच्या सीमाबंदीत केली ३० जूनपर्यंत वाढ
- पाकिस्तान ठरतोय गाढवांचा देश, चीनमुळे संख्येत विक्रमी वाढ
- TEAM INDIA WTC FINAL : भारतीय संघाची घोषणा ; रोहितसोबत युवा शुबमन गिलला सलामीला संधीश; विजेत्याला 12 कोटी
- संभाजीराजे यांच्यासमवेत आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा राजकीय होरा काय…??