• Download App
    विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले...|Jitan Ram Manjhi attacks Nitish Kumar over deaths due to toxic liquor

    विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…

    थोंडं थोडं मरण देण्यापेक्षा जनर डायरसारखं….असंही मांझी यांनी म्हटलं आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये काही संशयास्पद मृत्यू झाले आहेत. याबाबत बुधवारी (२२ नोव्हेंबर) जीतन राम मांझी यांनी निवेदन दिले आणि नितीश कुमार यांना म्हणाले की, ”थोडं, थोंड का मरण देत आहात. जनरल डायरसारखं सर्वांना रांगेत उभा करा आणि गोळ्या घाला.”Jitan Ram Manjhi attacks Nitish Kumar over deaths due to toxic liquor



    जीतन राम मांझी यांनी बुधवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिले, “नितीश कुमार विषारी दारूच्या नावाखाली गरिबांना थोडं थोडं मरण का देत आहेत? त्यांना जनरल डायर प्रमाणे रांगेत उभे करा आणि सर्वांना एकदाच गोळ्या घाला. तुमचा द्वेष संपुष्टात येईल.

    तसेच विषारी दारूमुळे मृत्यू होत आहेत. जर तुम्ही हे थांबवू शकत नसाल तर दारूबंदी कायद्याचा अर्थ काय? किमान गुजरातपासून तरी धडा घ्या.असंही मांझी यांनी नितीश कुमारांना उद्देशून म्हटलं आहे.

    खरं तर, याच महिन्यात सीतामढीमध्ये छठपूर्वी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. दारू पिऊन मृत्यू झाल्याचे गावकरी बोलत होते. मात्र प्रशासन काही वेगळेच सांगत होते. तसेच गोपालगंजमध्येही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या प्रकरणी गोपालगंज जिल्हा प्रशासनाने याचा इन्कार केला असून या सर्वांचा मृत्यू वेगवेगळ्या आजारांमुळे झाल्याचे म्हटले आहे.

    Jitan Ram Manjhi attacks Nitish Kumar over deaths due to toxic liquor

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा