विशेष प्रतिनिधी
रांची : Jharkhand झारखंडमध्ये राजकीय गदारोळात ज्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही, तो मुद्दा म्हणजे लोकसंख्येतील प्रमाणाच्या बदलाचा. झारखंडमध्ये डेमोग्राफी बदलाचा अर्थात लोकसंख्या बदलाचा अलार्म वाजला असून राज्यात आदिवासी हिंदूंची संख्या घटून मुस्लिमांची संख्या बेसुमार वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Jharkhand
1951 च्या जनगणनेत झारखंड मध्ये आदिवासींची संख्या 36 % होती, 2011 ती 10 % नी घटून 26 % झाली आहे, तर मुस्लिमांची लोकसंख्या 9 % वरून 14.5 % वर पोहोचली आहे. हिंदूंची लोकसंख्या 7 % नी घटली आहे. 2011 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 88 % होती, ती आता 81 % झाली आहे. संथाल आदिवासी परगण्यातील 6 जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या बदलाचा सर्वाधिक दुष्परिणाम झाला असून साहेबगंज आणि पाकुड या 2 जिल्ह्यांमध्ये तर मुस्लिमांची लोकसंख्या 35 % नी वाढल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने संसदेत या संदर्भात माहिती दिली आहे.Jharkhand
बांगलादेशी घुसखोरांनी झारखंड मधल्या विविध गावांवर कब्जा केला असून त्यामुळे लोकसंख्या बदलत भर पडली आहे. आदिवासींची जमीन हडपणे, मालमत्तेवर कब्जा करणे असले प्रकार झारखंड मधल्या विविध गावांमध्ये सुरू आहेत. झारखंड मधल्या आदिवासी आरक्षणावर याचा दुष्परिणाम झाला असून आदिवासींना उपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या आणि सवलतींमध्ये परिणामतः घट झाल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारा विरोधात जामताडाच्या यज्ञ मैदानामध्ये संथाल आदिवासी संमेलनामध्ये माजी मुख्यमंत्री बापूलाल मरांडी यांनी जनआक्रोश रॅली काढली होती. त्यामध्ये स्वतःच त्यांनी झारखंड मधल्या लोकसंख्या धोकादायक बदलाचा अलार्म वाजविला.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस त्याचबरोबर भाजप यांची सरकारी राहिली. सध्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांचे सरकार आहे. परंतु, यापैकी कुठल्याही सरकारने आदिवासींच्या धर्मांतराकडे आणि बांगलादेशी घुसखोरांकडे लक्ष देऊन त्याला परिणामकारक अटकाव केला नाही. झारखंडमध्ये वाढलेली मुस्लिम लोकसंख्या आणि घटलेली आदिवासी आणि हिंदूंची लोकसंख्या हे त्याचे निदर्शक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jharkhand dangerous demographic change, muslim population increases
महत्वाच्या बातम्या
- “हिंदुत्व” सोडले म्हणून ठाकरेंना शिंदेंनी ठोकले; पण शिंदे सेनेचे “हिंदुत्व” बुरखे वाटपावर आले!!
- Lucknow : यूपीत धर्मांतर करणाऱ्या 12 दोषींना जन्मठेप; 4 जणांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा; 1000 लोकांचे धर्मांतर
- Devendra Fadnavis : काँग्रेसी पंतप्रधानांच्या इफ्तार पाट्या जोरात; पण मोदी सरन्यायाधीशांच्या घरी गणपती दर्शनाला गेले, तर मोठा गहजब!!
- Prajwal Revanna : प्रज्वल रेवण्णाच्या जामीन याचिकेवर कर्नाटक हायकोर्टात सुनावणी; कोर्टाने म्हटले- सुनावणी खुल्या न्यायालयात होऊ शकत नाही