भाजपने झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर केली टीका
विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंडची राजधानी रांची येथील दलादली भागात सीपीआय (एम) नेते सुभाष मुंडा यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुभाष मुंडा हे त्यांच्या कार्यालयात असताना काही दुचाकीस्वारांनी येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. Jharkhand CPM leader Subhash Munda was killed shot inside the office
या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक नौशाद आलम यांनी सांगितले आहे. तर या घटनेबाबत झारखंड भाजपाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्य सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधला आहे.
बाबूलाल मरांडी यांनी ट्विट केले की, एकीकडे राजकुमार पोलीस अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याचा इशारा देत आहे. दुसरीकडे, रांचीमधील सर्वात गजबजलेल्या दलादली चौकात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या सुभाष मुंडा यांची गुन्हेगारांनी गोळ्या घालून हत्या केली.
बाबुलाल मरांडी यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, “राजधानी आणि संपूर्ण झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे हे वास्तव आहे. लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांच्या जागी फायरब्रँड अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थे सुधारणार नाही.”
Jharkhand CPM leader Subhash Munda was killed shot inside the office
महत्वाच्या बातम्या
- आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम जामीन मंजूर, मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप
- गडकरी म्हणाले- मतदार हा हुशार आहे, लोभी नाही; घरोघरी मटण वाटले, तरीही आम्ही निवडणूक हरलो
- मणिपूरवर चर्चा न झाल्याने जया बच्चन संतापल्या, नेत्यांनी चर्चा न करणे लाजिरवाणे असल्याची टीका
- पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांच्या पंखांना छाट; हा तर खरा थोरल्यांनाच भाजप श्रेष्ठींनी लावलेला चाप!! घेतला भाजप कार्यकर्त्यांचा क्लास!!