पत्रकार परिषद घेऊन मायावतींचा थेट हल्लाबोल
विशेष प्रतिनिधी
लखनौ : हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या विजयानंतर हिंदूंची एकजूट विरुद्ध जातीय मानसिकता यावर बरेच मंथन सुरू आहे. काँग्रेसने हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी जातीवादी कार्ड खेळायचा प्रयत्न केला, पण तो फसला, असे विश्लेषण अनेकांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी थेट जाट समाजाचे नाव घेऊनच जोरदार हल्लाबोल केला आहे. Jat community in Haryana did not vote for BSP
बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशातल्या जाट समाजाचे जातीय मानसिकतेतून काही प्रमाणात परिवर्तन घडवून आणले पण हरियाणातील जाट समाजाने दलित उमेदवारांना मते दिली नाहीत. त्याचा परिणाम म्हणून इंडियन नॅशनल लोक दल आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीला पराभवाचा सामना करावा लागला, अशा परखड शब्दांमध्ये मायावतींनी हरियाणा निवडणुकीचे विश्लेषण केले.
मायावती म्हणाल्या :
BSP-INLD युतीला काही जागा वगळता या जाट समाजाची मते मिळाली नाहीत. जातीयवादी मानसिकतेमुळे जाट समाजाने BSP ला मत दिले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आमचे दलित उमेदवार पडले. चौटाला घराण्यातील भांडणामुळे BSP चे दलित मत पूर्णपणे भाजपला गेले. या भांडणामुळे हरियाणाच्या निवडणुका जाट आणि गैर-जाट समुदायांमध्ये विभागल्या गेल्या.
वास्तविक हरियाणा हे एक कृषीप्रधान राज्य आहे. शेतीशी संबंधित लोक, विशेषत: जाट भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे खूश नव्हता. त्यामुळेच जाट समाजाची बहुसंख्य मते काँग्रेसला गेली. पण हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या काही जागा सोडल्या तर जाट समाजाने BSP उमेदवारांना मतदान केले नाही, बसपचे दलित मत संपूर्णपणे INLD उमेदवारांना मिळाले. पण त्यांच्याशी जोडलेला जाट समुदाय भाजप मते देऊन गेला. या भांडणात भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर आली. बसपचे खूप नुकसान झाले.
उत्तर प्रदेशातल्या मधील जाट समाजाची जातीयवादी मानसिकता बसपामुळे खूप बदलली आहे, पण हरियाणात ती बदललेली नाही. हरियाणातला जाट समुदाय दलितांबद्दलची त्यांची मानसिकता पूर्णपणे बदलू शकला नाही.
Jat community in Haryana did not vote for BSP
महत्वाच्या बातम्या
- Nobel Prize : AI गॉडफादर जेफ्री ई. हिंटन आणि अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन जे. होपफिल्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर
- Shagun Parihar : वडील आणि काकांना गोळ्या घालणाऱ्या दहशतवादावर मुस्लिम बहुल किश्तवाड मधून भाजपच्या शगुन परिहारांचा विजय!!
- Muijju : मुइज्जू म्हणाले- भारताच्या सुरक्षेला धक्का पोहोचू देणार नाही, आमचे संबंध चांगले, या भेटीत अधिक दृढ होतील
- Congress : तरुणांचे केले “कोळसे”, ज्येष्ठांना आणले “बाळसे” म्हणून काँग्रेसला सतत पराभवाचे तोंड दिसे!!