उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील घटना; सर्व बकऱ्या आता ‘शेळी निवारा’ ठिकाणी सुरक्षित
विशेष प्रतिनिधी
बागपत : देशभरात गुरुवारी ईद उल अजहा हा सण साजरा करण्यात आला. मुस्लिमांच्या या सणाला बकरी ईद असेही म्हणतात. बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा म्हणजे शेळ्यांचा बळी देण्यात येतो. देशभरात शेळ्यांच्या कुर्बानीबाबत अनेक बातम्या समोर आल्या परंतु दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या ठिकाणी जैन बांधवांनी २५० शेळ्यांचा जीव वाचवला आहे. Jain brothers showed mercy by buying 250 goats brought for sacrifice
उत्तर प्रदेशातील बागपत येथे जैन समुदायाच्या सदस्यांनी बकरी ईदपूर्वी २५० शेळ्या खरेदी केल्या आणि त्यांचा जीव जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना ‘शेळी निवारा’ ठिकाणी पाठवले. दिनेश जैन म्हणाले, “आमच्या जैन संतांनी आम्हाला शेळी निवारा ठिकाण तयार करण्यासाठी प्रेरित केले. आमच्या भागात मुस्लीम खूप आहेत आणि यावर कोणीही आक्षेप घेतला नाही.”.
शेळ्यांचा बळी दिला जाऊ नये म्हणून जैन समाजाने बाजारातून मोठ्या प्रमाणात शेळ्यांची खरेदी केली. बागपत जिल्ह्यातील अमीनगर सराय शहरातील ही घटना आहे. जैन समाजातील लोकांनी बाजारात विक्रीसाठी आलेल्या २५० शेळ्या खरेदी करून ‘शेळी निवारा’मध्ये ठेवल्या आहेत. या मुक्या प्राण्यांना बळी जाण्यापासून वाचवता यावे यासाठी जैन समाजाने हे केले आहे.
Jain brothers showed mercy by buying 250 goats brought for sacrifice
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार किंग मेकर नव्हे किंग ब्रेकर, ते सरकारे बनवण्यापेक्षा तोडण्यात माहीर; फडणवीसांचा प्रहार
- “ज्यांच्यामुळे इतकी वर्षे मुख्यमंत्री राहिलात, त्यांचा…” बिहारमध्ये अमित शाहांचा नितीश कुमारांवर निशाणा!
- पवारांनी मला नव्हे, पुतण्याला क्लीन बोल्ड केले, माझ्यामुळे ते अर्धसत्य तरी बोलले; फडणवीसांचा तिखट वार!!
- तामिळनाडू घटनात्मक संघर्ष; तुरुंगवासी मंत्री सेंथिल बालाजींना राज्यपालांनी हटविले; संतप्त मुख्यमंत्री जाणार कोर्टात!!