मोपल्यांनी केलेल्या नरसंहराला शंभर वर्षे पूर्ण झाली. या विषयी जनजागृती करण्यासाठी पांचजन्य नियतकालिकाने ऑनलाइन परिसंवाद घेतला. त्यात ते बोलत होते. खिलाफत आंदोलनात त्यावेळच्या मुसलमानांना अपयश आले. It was not the war of independence of Mopals, it was the Hindu genocide committed through jihad; Yogi Adityanath’s eloquent statement
वृत्तसंस्था
लखनौ : मलबारमध्ये सन 1921 मध्ये झालेले मोपल्यांचे बंड हे स्वातंत्र्ययुद्ध वगैरे काही नव्हते, तो हिंदूंविरुद्धचा जिहादच होता आणि त्यातून मोपल्यांनी हजारो हिंदूंचा नरसंहार केला, असे परखड प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
मोपल्यांनी केलेल्या नरसंहराला शंभर वर्षे पूर्ण झाली. या विषयी जनजागृती करण्यासाठी पांचजन्य नियतकालिकाने ऑनलाइन परिसंवाद घेतला. त्यात ते बोलत होते. खिलाफत आंदोलनात त्यावेळच्या मुसलमानांना अपयश आले. त्यातून चिडून जाऊन त्यांनी हिंदूविरुद्ध जिहाद पुकारला.
परंतु त्यावेळच्या इतिहासकारांनी आणि स्वातंत्र्यानंतरच्या देखील डाव्या विचारसरणीचा इतिहासकारांनी या जिहादला स्वातंत्र्य युद्धाचे रूप दिले. मुसलमान मजुरांनी हिंदू जमीनदारांनी विरुद्ध पुकारलेले बँड म्हटले. परंतु जर ते फक्त जमीनदारी विरुद्धचे बंड असते तर हजारो सर्वसामान्य हिंदूंची हत्या का केली गेली?, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी विचारला.
प्रत्यक्षात ते बंड वगैरे काही नव्हते तो मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात पुकारलेला जिहादच होता. त्यांनी हजारो हिंदूंचा नरसंहार केला यातले सत्य प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडले. त्यांनी “मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे?” या कादंबरीतून हिंदू समाजाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील मोपल्यांच्या बंडला हिंदू विरुद्ध पुकारलेला जिहाद असेच नाव दिले. मोपल्त्यांनी दाखवताना आंदोलन ब्रिटिशांविरुद्ध दाखवले पण प्रत्यक्षात हिंदूंचा नरसंहार केला, असे डॉक्टर आंबेडकर यांनी म्हटले आहे, याकडे योगी आदित्यनाथ यांनी आवर्जून लक्ष वेधले.
It was not the war of independence of Mopals, it was the Hindu genocide committed through jihad; Yogi Adityanath’s eloquent statement
महत्त्वाच्या बातम्या
- देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानांचा अमेरिकेला विनाथांबा थेट प्रवास
- CYCLONE GULAB : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! चक्रीवादळ गुलाबमुळे भारतीय रेल्वेने 27 सप्टेंबरपर्यंत अनेक गाड्या केल्या रद्द ; पाहा संपूर्ण यादी…
- एअरबस कडून भारत ५६ लष्करी वाहतूक विमाने खरेदी करणार, तब्बल २० हजार कोटींचा करार
- विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ