• Download App
    India's border will penetrate 150 kilometers deep into Pakistan, भारताची सीमा पाकिस्तानच्या आत 150 किलोमीटर

    भारताची सीमा पाकिस्तानच्या आत 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, पुढच्या 5 वर्षांत मोठ्या उलथापालथी; संघ नेते इंद्रेश कुमारांचे भाकित!!

    India's border

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पुढच्या पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या उलथापालथी घडून भारताची सीमा सध्याच्या पाकिस्तानच्या आतमध्ये 150 किलोमीटर पर्यंत खोलवर घुसेल, असे खळबळजनक आणि गंभीर भाकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी शिमला मधल्या पत्रकार परिषदेत केले. संघाच्या वरिष्ठ नेत्याने एवढे थेट भाकीत केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटलेत.India’s border will penetrate 150 kilometers deep into Pakistan,

    2025 नंतर जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी होतील. अनेक देशांचे नकाशे बदलतील. अनेक जुने देश मिटतील आणि नवे देश अस्तित्वात येतील, अशी भाकिते राजनैतिक आणि ज्योतिषीय तज्ञांनी अनेकदा वर्तविली. त्यानुसार जागतिक पातळीवर काही घडामोडी देखील घडल्या. सध्या देखील operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अभूतपूर्व तणावाची स्थिती असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याने उघडपणे भारताची सीमा पाकिस्तान मध्ये खोलवर घुसण्याचे भाकीत केले. त्यामुळे भारताने आत्तापर्यंत केलेल्या सर्व प्रकारच्या कारवाईचे गांभीर्य लक्षात आले. त्याचबरोबर इथून पुढे करणार असलेल्या कारवाईचे गांभीर्य वाढले.



    इंद्रेश कुमार म्हणाले :

    – येत्या पाच – सात वर्षांमध्ये जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडतील. भारताची सीमा पाकिस्तान मध्ये 100शंभर ते 150 किलोमीटर आतपर्यंत जाईल. कच्छच्या रणापासून लडाख पर्यंत बराच प्रदेश “मोकळा” होईल. याची भीती चीन आणि अमेरिकेला वाटते.

    – पाकिस्तानातले सिंध, बलुचिस्तान, पख्तुनिस्तान हे प्रांत पाकिस्तानच्या विरोधात लढायला उभे राहतील. एक तर ते स्वतंत्र होतील किंवा भारतात विलीन होतील. पाकिस्तान व्याप्त काश्मीर देखील भारतात विलीन होईल, हे घडायला फार दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही. येत्या पाच – सात वर्षांमध्ये हे घडून येईल.

    – भारतीय जनतेची, भारताच्या सरकारची, भारताच्या सैन्याची आणि एकूणच या विभागातल्या सगळ्या लोकांची अशीच इच्छा आहे, की पाकिस्तान नावाचा देश आता अस्तित्वात राहू नये. जो काही पंजाबी पाकिस्तान अस्तित्वात राहील, तिथे देखील लोक सध्याची राजवट आणि राज्यव्यवस्था उलथवून लावतील.

    – आज शिमला मध्ये पत्रकार परिषद होत आहे. कदाचित पाच वर्षांनी लाहोर मध्ये अशीच पत्रकार परिषद होईल. हे सगळे पाहण्यासाठी ईश्वराने आपल्यावर कृपा करावी, अशी आपण सगळेच प्रार्थना करू. आजच्या पत्रकार परिषदेत मी अनेक गोष्टींच्या Hint दिल्यात. त्यांचा सगळ्यांनी बारकाईने अभ्यास करावा.

    India’s border will penetrate 150 kilometers deep into Pakistan, major upheavals in the next 5 years; Prediction of RSS leader Indresh Kumar!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Census : जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होईल, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

    भारताची निर्यात किती वाढली?, आयात किती घटली?; वाचा नीट आकडेवारी!!

    Aamir Khan : लव्ह जिहादच्या आरोपांवर आमिर खानचं सडेतोड उत्तर, माझ्या बहिणी आणि मुलीचे हिंदूंसोबत लग्न, प्रेमाला धर्माचं बंधन नसतं