• Download App
    भारताच्या कृषी निर्यातीत 18 टक्क्यांनी वाढ , कोरोना संकटात पुरवठा अखंड ; मंत्री पियुष गोयल यांची माहिती|India's agricultural exports grow by 18%,Supply intact in Corona crisis; Information of Minister Piyush Goyal

    कोरोनातही बळीराजांची चमकदार कामगिरी:२.७४ लाख कोटींची कृषी निर्यात; घसघशीत १८ टक्क्यांची वाढ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाही भारताच्या कृषी निर्यातीत कोणताच खंड पडलेला नाही.या उलट निर्यातीत 18 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल यांनी दिली.India’s agricultural exports grow by 18%,Supply intact in Corona crisis; Information of Minister Piyush Goyal

    एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत कृषी आणि अन्नधान्यांची सुमारे 2.74 लाख कोटींची निर्यात केली. ती त्या पूर्वीच्या एवढ्याच कालावधीपेक्षा 18 टक्के अधिक आहे.
    गहू, तांदूळ (बासमती नाही), सोया , मसाले, साखर, कच्चा कापूस, ताजा भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या भाज्या आणि मद्य निर्यातीत सकारात्मक मोठी वाढ झाली.



    गतवर्षीच्या तुलनेत गहू निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. ती 425 कोटी रुपयांवरुन 3 हजार 283 कोटी रुपयांवर पोचली आहे. भारताने लेबेनॉनला गहू निर्यात केला होता. त्याची टक्केवारी 72 टक्के आहे.

    नाफेडने 50 हजार टन गहू अफगाणिस्तान आणि 40 हजार टन गहू लेबेनॉनला निर्यात केला आहे. कोरोना संकटातही भारताने कृषी निर्यात अखंड ठेऊन जागतिक अन्नपुरवठा साखळी तोडली नाही, हे या निर्यातीवरून स्पष्ट होते.

    कृषीच्या आयातीत 3 टक्के वाढ

    एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत भारताने 1.41 लाख कोटींच्या कृषी पदार्थांची आयात केली. ती या कालावधीच्या आधी 1.37 लाख कोटींची आयात केली होती. यंदा ती 3 टक्क्याने अधिक आहे.

    एकंदरीत आयात आणि निर्यातीचा विचार केला तर कोरोना काळात कृषी निर्यात ही एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत 1.32 लाख कोटींची झाली असून याच कालावधीत 2019 ते 2020 दरम्यान, ती 93 हजार 907 कोटी एवढी होती.

    India’s agricultural exports grow by 18%,Supply intact in Corona crisis; Information of Minister Piyush Goyal

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे