- मुंबईत आठ विकेट्स राखून विजय मिळवला
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची कसोटीतील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. इंग्लंडपाठोपाठ आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही विजय मिळवला आहे. टीम इंडियाने एकमेव कसोटी सामन्यात कांगारू संघाचा आठ गडी राखून पराभव केला.Indian womens team made history Defeated Australia for the first time in a Test
भारताने 406 धावा केल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य दोन गडी गमावून भारताने पूर्ण केले.
स्मृती मंधानाने दुसऱ्या डावात भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. शेफाली वर्माला केवळ चार धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून किम गर्थ आणि ऍशले गार्डनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला पहिला विजय मिळाला आहे. दोन्ही संघांमध्ये 1977 पासून आतापर्यंत 11 कसोटी सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने चार विजय मिळवले आहेत. सहा कसोटी अनिर्णित राहिल्या आणि आता भारताला एक विजय मिळाला.
Indian womens team made history Defeated Australia for the first time in a Test
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडी समर्थक बुद्धिमत्तांची लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराची भाषा; तर भाजपचे 35 कोटी मतांचे टार्गेट!!
- ”भारतात अल्पसंख्याक सुखी आहेत, लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना वास्तवाची जाणीव नाही”
- संसदेचे सत्र संपले, खासदारांचे निलंबनही रद्द; पण INDI आघाडीच्या नेत्यांची आजही आंदोलनाची “जिद्द”!!
- मोदी सरकारच्या प्रगत भारत संकल्प रथाला दाखवला जातोय “नागरिकांचा” विरोध; पण हा तर राष्ट्रवादीचा छुपा पॅटर्न!!