• Download App
    Pakistan High Commission भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याला २४ तासांत भारत सोडण्याचे दिले आदेश

    भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याला २४ तासांत भारत सोडण्याचे दिले आदेश

    यासंबंधी पत्र पाकिस्तान उच्चायुक्तालयालाही सादर करण्यात आले. Pakistan High Commission 

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आहे आणि २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी पत्र पाकिस्तान उच्चायुक्तालयालाही सादर करण्यात आले.

    भारतातील कोणताही पाकिस्तानी राजदूत किंवा अधिकारी त्याच्या विशेषाधिकारांचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही याची खात्री करण्यास त्यांना सांगण्यात आले. एखाद्या व्यक्तीला अवांछित घोषित करणे ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये त्या व्यक्तीला ताबडतोब देश सोडण्यास सांगितले जाते.

    राजनैतिक पातळीवर ही एक अतिशय गंभीर प्रतिक्रिया मानली जात आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असताना भारताने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी १३ मे रोजी भारताने पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला त्याच्या अधिकृत दर्जानुसार काम न केल्याबद्दल हद्दपार केले होते. त्या अधिकाऱ्याला भारत सोडण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला होता.

    Indian government orders Pakistan High Commission official to leave India within 24 hours

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Sarma : …अन् संतप्त मुख्यमंत्री सरमांनी दिले दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश!

    Vijay Rupani : विजय रुपाणी यांचा लकी नंबर १२०६चा त्यांच्या मृत्यूशी कसा आला संबंध?

    That last selfie : विमानातला तो शेवटचा सेल्फी! डॉक्टर दाम्पत्य तीन मुलांसह सुरू करणार होते नवीन आयुष्य, पण…