• Download App
    Wagah-Attari border 'भारत माता की जय' या घोषणेचा आवाज लाहोरपर्यंत पोहोचला!

    Wagah-Attari border ‘भारत माता की जय’ या घोषणेचा आवाज लाहोरपर्यंत पोहोचला!

    वाघा-अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीटमध्ये भारताच्या सीमा रक्षकांनी पाकिस्तानी रेंजर्सना दिले आव्हान  Wagah-Attari border

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. यानिमित्ताने कर्तव्य पथ येथे आयोजित समारंभात देशाच्या लष्करी सामर्थ्याची, कला, संस्कृतीची, विविधतेची आणि सरकारी योजनांच्या यशाची झलक पाहायला मिळाली. कर्तव्य पथावर जगाने नवीन भारताची ताकद पाहिली. ७६ व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनी परेडची सलामी घेतली. ज्यामध्ये विकास, वारसा आणि संस्कृतीसह नवीन भारताची झलक दिसून आली.

    प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराचे शक्तिशाली रणगाडे आणि लष्करी वाहने आकर्षणाचे केंद्र होते. या परेडमध्ये इंडोनेशियन लष्कराच्या तुकडीनेही भाग घेतला. यावेळी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी होणारे ते इंडोनेशियाचे चौथे राष्ट्रपती ठरले. १९५० मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो प्रमुख पाहुणे होते.

    भारत आणि पाकिस्तानमधील वाघा-अटारी सीमेवर दररोज बीटिंग रिट्रीट सेरेमनी आयोजित केली जाते. पण २६ जानेवारी हा एक खास दिवस आहे. या समारंभात, भारताच्या बाजूने सीमा सुरक्षा दलाचे (BSP) कर्मचारी आणि पाकिस्तानच्या बाजूने PAK रेंजर्सचे कर्मचारी भाग घेतात. दोन्ही देशांतील हजारो पर्यटक त्यांच्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी सहभागी होतात. उत्साही भारतीयांनी सैनिकांची सलामी पाहिली तेव्हा ‘भारत माता की जय’ चा नारा लोहारापर्यंत ऐकू आला असेल.

    बीटिंग रिट्रीटमध्ये, आपला राष्ट्रध्वज तिरंगा सलामी देऊन खाली उतरवला जातो, बीएसएफचे सैनिक त्यांचे पाय डोक्यापर्यंत उचलून सलामी देतात. सूर्यास्तापूर्वी सलामी देऊन तिरंगा खाली उतरवला जातो. १९५९ पासून वाघा-अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो.

    Indian border guards challenge Pakistani Rangers in beating retreat at Wagah-Attari border

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार