• Download App
    Sharia Tejashwi Surya भारत शरियानुसार नव्हे तर संविधानानुसार

    Sharia Tejashwi Surya : ‘भारत शरियानुसार नव्हे तर संविधानानुसार चालेल’ ; तेजस्वी सूर्या संतापले!

    Sharia Tejashwi Surya

    वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर दावा


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : Sharia Tejashwi Surya उत्तर कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील होनवाडा गावातील वक्फ मालमत्तेवर शेतकऱ्यांच्या त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या दाव्यावरून वाद आणखी वाढला आहे. शुक्रवारी बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी दावा केला की कर्नाटक वक्फ बोर्डाने 1,500 एकर जमिनीवर दावा केला आहे.Sharia Tejashwi Surya

    तिकोटा तालुक्यात येणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामध्ये कोणतेही स्पष्टीकरण न देता जमिनी वक्फ मालमत्ता घोषित करण्यात आल्या आहेत. सूर्या यांनी आरोप केला आहे की कर्नाटकचे वक्फ मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांनी उपायुक्त आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना वक्फ बोर्डाच्या नावे १५ दिवसांत जमिनीची नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.



    असे करून मोदी सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 च्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या सुधारणांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही खासदार सूर्या यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचीही अवहेलना केली जात आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना बाजूला करून त्यांच्या जमिनीची महसूल खात्यात वक्फ बोर्डाच्या नावावर नोंद केली जाईल.

    भारत शरिया किंवा जमीर अहमद खान सारख्या मंत्र्यांच्या निर्देशांनुसार नव्हे तर संविधान आणि कायद्याने चालवला जाईल. याबाबतही सूर्या यांनी काँग्रेसवर निशाणा साधत 1955 चा वक्फ कायदा आणि त्यानंतर 2013 मधील दुरुस्तीने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले असल्याचे सांगितले. ते कोणत्याही जमिनीवर वक्फ मालमत्ता म्हणून दावा करू शकतात. असे कायदे करून काँग्रेसने संपूर्ण देशातील नागरिकांचा विश्वासघात केला आहे. असंही सूर्या म्हणाले.

    India will run according to the Constitution not Sharia Tejashwi Surya gets angry

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका