• Download App
    दुनियेत शांतता प्रस्थापनेसाठी भारत मजबूत हवा; आरिफ मोहम्मद खान यांची महात्मा गांधींना श्रद्धांजलीIndia needs to be strong for establishing peace in the world

    दुनियेत शांतता प्रस्थापनेसाठी भारत मजबूत हवा; आरिफ मोहम्मद खान यांची महात्मा गांधींना श्रद्धांजली

    वृत्तसंस्था

    साबरमती : दुनियेमध्ये जर तुम्ही शांतता प्रस्थापित करू पाहत असाल तर प्रथम भारत मजबूत हवा. त्यासाठीच राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी साबरमती आश्रमात केले आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते येथे आले होते. India needs to be strong for establishing peace in the world

    आरिफ मोहम्मद खान म्हणाले :

    जगात शांतता हवी असेल तर भारतालाच मजबूत व्हावे लागेल. भारताची एकात्मता आणि अखंडचा टिकवण्यासाठी राष्ट्रवादाची भावना उपयुक्त ठरेल.

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर झालेल्या फाळणीचे घाव आम्ही विसरलो. आम्ही देश बांधणीच्या कामालाही लागलो. आम्हाला विसरण्याची वाईट सवय आहे. पण शेजारचा देश आम्हाला काहीच विसरू देत नाही. उलट “अनफिनिश्ड अजेंडा ऑफ पार्टिशन” असे म्हणून शेजारचा देश जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवतो. आम्हाला त्या दहशतवादाशी लढावेच लागेल. इतरांना इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर स्वसंरक्षणासाठी भारताला मजबूत व्हावेच लागेल.

    जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत भारतच चांगले काम करू शकेल. स्वातंत्र्यानंतरचा गेल्या 75 वर्षांचा अनुभव घेऊन पुढची वाटचाल करावी लागेल.

    India needs to be strong for establishing peace in the world

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न