वृत्तसंस्था
साबरमती : दुनियेमध्ये जर तुम्ही शांतता प्रस्थापित करू पाहत असाल तर प्रथम भारत मजबूत हवा. त्यासाठीच राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी साबरमती आश्रमात केले आहे. महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते येथे आले होते. India needs to be strong for establishing peace in the world
आरिफ मोहम्मद खान म्हणाले :
जगात शांतता हवी असेल तर भारतालाच मजबूत व्हावे लागेल. भारताची एकात्मता आणि अखंडचा टिकवण्यासाठी राष्ट्रवादाची भावना उपयुक्त ठरेल.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर झालेल्या फाळणीचे घाव आम्ही विसरलो. आम्ही देश बांधणीच्या कामालाही लागलो. आम्हाला विसरण्याची वाईट सवय आहे. पण शेजारचा देश आम्हाला काहीच विसरू देत नाही. उलट “अनफिनिश्ड अजेंडा ऑफ पार्टिशन” असे म्हणून शेजारचा देश जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवतो. आम्हाला त्या दहशतवादाशी लढावेच लागेल. इतरांना इजा पोहोचवण्यासाठी नव्हे तर स्वसंरक्षणासाठी भारताला मजबूत व्हावेच लागेल.
जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत भारतच चांगले काम करू शकेल. स्वातंत्र्यानंतरचा गेल्या 75 वर्षांचा अनुभव घेऊन पुढची वाटचाल करावी लागेल.
India needs to be strong for establishing peace in the world
महत्वाच्या बातम्या
- MPSC मार्फत रिक्त पदांची भरती प्रक्रिया उद्या ३ ऑक्टोबरपासून सुरू; अर्ज करा ऑनलाईन
- इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यूचा खेळ : स्टेडियममधील चाहते बेकाबू, चेंगराचेंगरीत 129 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
- भारत IT एक्सपर्ट, शेजारचा देशही IT एक्सपर्ट… पण…; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा टोला
- प्रशांत किशोर आज पासून बिहारच्या 3500 किलोमीटर पदयात्रेवर; पण पावले कुणाच्या पावलांवर??