• Download App
    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा पाहिजेतच, अन्यथा लोकशाही धोक्यात!! India needs Population Control Act and Uniform Civil Code

    भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा पाहिजेतच, अन्यथा लोकशाही धोक्यात!!

    • केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा पुन्हा गंभीर इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा पाहिजेतच अन्यथा लोकसंख्येचे असंतुलन संपूर्ण देशाची लोकशाही व्यवस्थाच धोक्यात आणेल, असा इशारा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी दिला आहे. India needs Population Control Act and Uniform Civil Code

    यासाठी त्यांनी काही तर्क दिले आहेत. भारतात ज्या राज्यांमध्ये बहुसंख्यांक म्हणजे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे लोकशाही व्यवस्था धोक्यात आली. बांगलादेश आणि पाकिस्तान ही त्याची उदाहरणे आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.

    भारतात आजही लोकसंख्या संतुलनाची समस्या आहेच. काश्मीर, केरळ पूर्वांचल मधील काही राज्ये आणि बंगाल इथल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहिले, तर लोकसंख्येतील असंतुलन धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे लक्षात येते आणि त्याचाच दुष्परिणाम भारताच्या ऐक्यावर, अखंडतेवर आणि लोकशाहीवर होण्याची दाट शक्यता आहे.

    म्हणूनच देशात लवकरात लवकर लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा संसदेत मंजूर करून घेऊन त्याची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच देशातली सामाजिक समता, समरसता आणि देशाची अखंडता टिकून राहील अन्यथा देशापुढीर काही कठीण समस्या अधिक उग्र रूप धारण करतील, असा गंभीर इशारा गिरीराज सिंह यांनी दिला आहे.

    India needs Population Control Act and Uniform Civil Code

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    TMC MLA Jivan Krishna Saha : शालेय भरती घोटाळ्यात TMC आमदाराला अटक; ED अटकेसाठी आल्यानंतर भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला

    Prashant Kishor : प्रशांत किशोर म्हणाले- आधी काँग्रेस-लालू आणि आता नितीश, तरीही तुमचे जीवन सुधारले नाही

    Narendra Modi : PM मोदींची DU ची पदवी सार्वजनिक केली जाणार नाही; दिल्ली हायकोर्टाने केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश रद्द केला