• Download App
    भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत - मोदीIndia is moving forward on every front and our critics are at their lowest Modi

    भारत प्रत्येक आघाडीवर पुढे जात आहे अन् आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर आहेत – मोदी

    भारताच्या क्षमतांबद्दल इतकी सकारात्मक धारणा यापूर्वी कधीही नव्हती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, विकास दर सतत वाढत असताना, भारताची वेळ आली आहे आणि ‘आमचे टीकाकार सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत’. टाइम्स ग्रुपच्या ‘ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट’ला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जगाचा भारतावरील विश्वास सतत वाढत आहे. India is moving forward on every front and our critics are at their lowest Modi

    ते म्हणाले, ‘व्यावसायिकांसाठी कुंभमेळ्याप्रमाणे मानल्या जाणाऱ्या दावोसच्या बैठकीतही भारताविषयी प्रचंड उत्साह होता. तिथं कुणी म्हटलं की भारत ही अभूतपूर्व यशोगाथा आहे, कुणी म्हटलं की भारताची डिजिटल पायाभूत सुविधा नव्या उंचीवर पोहोचत आहे, तर कुणी म्हटलं की भारताचा प्रभाव नाही अशी कोणतीही जागा नाही. पंतप्रधान म्हणाले की, आज विकासाशी संबंधित प्रत्येक तज्ज्ञ गटामध्ये चर्चा होत आहे की गेल्या 10 वर्षांत भारत बदलला आहे.


    नरसिंह रावांना मोदी सरकारने दिला भारतरत्न किताब; काँग्रेस नेत्यांच्या घशात झाला खवखवाट!!


     

    ते म्हणाले, ‘या गोष्टींवरून जगाचा भारतावर किती विश्वास आहे हे दिसून येते. भारताच्या क्षमतांबद्दल इतकी सकारात्मक धारणा यापूर्वी कधीही नव्हती. भारताच्या यशाबद्दल इतकी सकारात्मक धारणा कदाचित याआधी कधीच पाहिली गेली नसेल.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रवासात एक वेळ अशी येते की सर्व परिस्थिती त्याच्यासाठी अनुकूल असते आणि त्या वेळी तो देश पुढील अनेक शतके स्वत:ला मजबूत करतो. ते म्हणाले, आता मला भारतासाठी तीच वेळ दिसत आहे.

    India is moving forward on every front and our critics are at their lowest Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!