Income tax dept raids offices of Dainik Bhaskar Group : कर चुकवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने दै. भास्कर वृत्तपत्राच्या मालकांच्या घरांवर आणि संस्थांवर छापे टाकले आहेत. रात्री अडीच वाजेपासून कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले जात असल्याची माहिती मिळाली आहे. दै. भास्करच्या नोएडा, जयपूर आणि अहमदाबाद कार्यालयात प्राप्तिकर विभागाने हे छापे टाकले आहेत. Income tax dept raids offices of Dainik Bhaskar Group at Noida jaipur and ahemadabad
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : कर चुकवल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने दै. भास्कर वृत्तपत्राच्या मालकांच्या घरांवर आणि संस्थांवर छापे टाकले आहेत. रात्री अडीच वाजेपासून कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकले जात असल्याची माहिती मिळाली आहे. दै. भास्करच्या नोएडा, जयपूर आणि अहमदाबाद कार्यालयात प्राप्तिकर विभागाने हे छापे टाकले आहेत.
सर्व कर्मचार्यांचे फोन जप्त
प्राप्तिकर विभागाचा हा मोठा छापे असल्याचे सांगण्यात येत आहे. भास्करच्या कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचार्यांचे फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच कोणालाही बाहेर जाऊ दिले जात नाही. प्रेस कॉम्प्लेक्ससह अर्धा डझन ठिकाणी प्राप्तिकर विभागाचे पथक उपस्थित आहे.
महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचा दावा
ईडी, प्राप्तिकर विभाग यांच्याबरोबरच स्थानिक पोलिसांचेही समर्थन आहे. संपूर्ण शोधमोहीम दिल्ली व मुंबई पथकानी राबवली आहे. या छाप्यात 100 हून अधिक अधिकारी कर्मचारी सामील आहेत. या छापेमारी दरम्यान महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
छाप्यांवरून कॉंग्रेसचा सरकारवर निशाणा
या हल्ल्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर हल्ला केला आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट केले की, “रेड जीव्ही जी, पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर भ्याड हल्ला! दैनिक भास्करच्या भोपाळ, जयपूर आणि अहमदाबाद कार्यालयांवर प्राप्तिकर छापा. “रेड राज”ने लोकशाहीचा आवाज दडपू शकणार नाही.
Income tax dept raids offices of Dainik Bhaskar Group at Noida jaipur and ahemadabad
महत्त्वाच्या बातम्या
- पॉर्न चित्रपट प्रकरणात कुंद्राच्या कार्यालयावर छापा : पॉर्न सामग्री अपलोड करणारा सर्व्हर जप्त
- सीएए, एनआरसीचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर – संरसंघचालक भागवत यांची टीका
- उत्तर प्रदेशात आता चक्क फुलनदेवीचे १८ पुतळे उभारले जाणार
- नवज्योतसिंग सिद्धूंच्या शक्तीप्रदर्शनाला तब्बल ६२ आमदारांची हजेरी, अमरिंदर यांचा विरोध झुगारला
- कोरोना मृतांचा नेमका आकडा किती? देशात ४० लाखांहून अधिक बळी गेल्याची भिती