• Download App
    पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपच मारणार बाजी, सी व्होटरच्या सर्वेक्षणात झाले स्पष्ट|In western Uttar Pradesh, BJP will win, it was clear in the C-Voter survey

    पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपच मारणार बाजी, सी व्होटरच्या सर्वेक्षणात झाले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील पहिल्या टप्यातील मतदानाला आता केवळ काही तास उरले आहेत. जाटबहुल पश्चिम उत्तर प्रदेशात होत असलेल्या १०२ जागांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. याच ठिकाणी उत्तर प्रदेशातील आगामी सत्ताधाऱ्या चा फैसला होणा आहे.In western Uttar Pradesh, BJP will win, it was clear in the C-Voter survey

    या भागात भाजपला समाजवादी पक्ष- राष्ट्रीय लोकदल आघाडीकडून आव्हान दिले जात असले तरी बाजी भाजपच मारणार असल्याचे सी व्होटरच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.मतदानापूर्वी झालेल्या शेवटच्या ओपिनियन पोलच्या निकालावरून मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात असल्याचे दिसून येते.



    सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. भाजपला २२५-२३७ जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला १३९-१५१ जागा मिळू शकतात. बसपाला १३-२१ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला फक्त ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

    शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि सपा-आरएलडी युतीतून भाजपचे आव्हान वाढल्याने बहुतांशी नजर पश्चिम यूपीकडे आहे. सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ जागांपैकी भाजप ७१-७५ जागा जिंकू शकतो,

    तर सपा ५०-५४ जागा जिंकू शकतो. बसपाला ८-१० जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला १-३ जागांवर समाधान मानावं लागेल. याशिवाय इतरांना ०-१ जागा मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    In western Uttar Pradesh, BJP will win, it was clear in the C-Voter survey

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे