• Download App
    लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 'या' दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!|In the fifth phase of the Lok Sabha elections the fate of these veterans will be at stake

    लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार!

    जाणून घ्या, कोणत्या VIP जागांवर असेल लक्ष


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज, सोमवारी (20 मे) होणार आहे. या टप्प्यात 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होणार आहे. या जागांमध्ये अमेठी आणि रायबरेली या दोन हाय-प्रोफाईल जागांचाही समावेश आहे, जिथून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानल्या जातात, मात्र गेल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव करत अमेठीची जागा भाजपला मिळवून दिली.In the fifth phase of the Lok Sabha elections the fate of these veterans will be at stake



    त्याचवेळी रायबरेलीची जागा 2004 पासून काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि सोनिया गांधी या जागेचे प्रतिनिधित्व करत होत्या. या जागेवरून भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पाचव्या टप्प्यात ज्या 49 जागांवर मतदान होणार आहे, त्यापैकी 40 जागा एनडीएने 2019 च्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. आज महाराष्ट्रातील 13, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7, बिहारमधील 5, झारखंडमधील 3, ओडिशातील 5, जम्मू-काश्मीरमधील 1 आणि लडाखमधील 1 जागांवर मतदान होणार आहे.

    पाचव्या टप्प्यात अनेक मंत्री आणि नामांकित चेहऱ्यांचे भवितव्यही ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. या टप्प्यात मोदी सरकारमधील मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, पियुष गोयल यांच्यासह भाजपचे राजीव प्रताप रुडी यांच्यासारखे दिग्गज नेते रिंगणात आहेत. याशिवाय शंतनू ठाकूर, चिराग पासवान, श्रीकांत शिंदे आणि रोहिणी आचार्य यांच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे.

    In the fifth phase of the Lok Sabha elections the fate of these veterans will be at stake

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच