• Download App
    75 % लोकसंख्या : झारखंडच्या गढवा मध्ये मुस्लिमांनी दबावाने बदलायला लावली शालेय प्रार्थना!!In Gadhwa, Jharkhand, Muslims forced school prayers to be changed

    75 % लोकसंख्या : झारखंडच्या गढवा मध्ये मुस्लिमांनी दबावाने बदलायला लावली शालेय प्रार्थना!!

    वृत्तसंस्था

    गढवा : झारखंड राज्यातील गढवा या गावात मुस्लिमांची लोकसंख्या 75 % आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मागणीनुसारच कायदे कानून बनले पाहिजेत, अशी मागणी करत तेथील मुस्लिम आणि शालेय प्रार्थना बदलायला लावली आहे. In Gadhwa, Jharkhand, Muslims forced school prayers to be changed

    गढवा गावातील शाळेचे मुख्याध्यापक युगेश राम यांच्यावर अनेक दिवस गावातले मुस्लिम युवक दबाव आणत होते. शालेय प्रार्थना बदलून टाकण्याची मागणी करून धमक्या देत होते. अखेर त्यांच्या दबावापुढे योगेश राम यांना झुकावे लागले आणि त्यांनी शालेय प्रार्थना “विद्या दान दे” ही बदलून “तू राम तू रहीम” ही प्रार्थना सुरू करायला लागली. इतकेच नाही तर प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांना हात जोडून उभे राहायला पण बंदी लादली आहे.

    या संदर्भात सुरुवातीला योगेश राम यांनी गावचे सरपंच शफीक अन्सारी यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी झारखंडच्या शिक्षण मंत्रालयात देखील पत्रव्यवहार केल्या. परंतु, शफिक अन्सार यांनी देखील दबाव वाढवत योगेश राव यांना शालेय प्रार्थना बदलायला भाग पाडले.

    – शिक्षण खात्याचे चौकशीचे आदेश

    आता झारखंडच्या शिक्षण खात्याने या प्रकाराची दखल घेतली असून शिक्षणाधिकारी मयंक कुमार यांनी या प्रकाराची चौकशी करून योग्य ते आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले आहे. कोणत्याही दबावापोटी शालेय प्रार्थना बदलणे अथवा शालेय गणवेश बदलणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे. असा कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही. तो घेईल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मयंक कुमार यांनी दिला आहे.

    In Gadhwa, Jharkhand, Muslims forced school prayers to be changed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले- SIR मध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही; बंगालमध्ये अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याची अंतिम मुदत एक आठवड्याने वाढवली

    Sonam Wangchuk : सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले- वांगचुक पूर्णपणे ठीक; एम्समध्ये चांगले उपचार मिळत आहेत; वांगचुक यांच्या वकिलांनी अटकेवर विचार करण्यास सांगितले

    India-Pakistan Match : ICCने पाकिस्तानच्या तीन अटी फेटाळल्या; फायनल अल्टीमेटम दिला, PCB यू-टर्न घेणार; भारताविरुद्धचा विश्वचषक सामना जवळजवळ निश्चित