विशेष प्रतिनिधी
कानपूर – आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा. नवीन पदवीधारकांनी येत्या २५ वर्षांत त्यांना हवा तसा भारत घडविण्यासाठी काम सुरू करावे. त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हावे, आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.IIT students will choose challenges says Modiji
आयआयटी कानपूरच्या ५४ व्या पदवीप्रदान समारंभात बोलताना मोदी म्हणाले, की विद्यार्थ्यांना देशाच्या विकासाची सूत्रे हातील घ्यायची असून त्यासाठी आताच काम सुरू करायला हवे. देश अमाप संधींच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगत या संधींचा फायदा घ्या.
अनेकजण तुम्हाला सोयीसुविधांसाठी शॉर्टकट निवडण्याचा सल्ला देतील. मात्र, तुम्ही तो निवडू नये, असा माझा सल्ला आहे. आयुष्यात तुम्हाला हवी असो किंवा नको असली तरी आव्हाने असतातच. त्यामुळे, आव्हाने निवडा.
आव्हानांपासून पळ काढणाऱ्यांचा बळी जातो, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी अधीर व्हायला हवे. संपूर्ण स्वातंत्र्याचा आत्मनिर्भर भारत हा गाभा आहे, जिथे आपण कोणावरही अवलंबून नसू.
IIT students will choose challenges says Modiji
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई – पुणे – दिल्लीसह सहा ते आठ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाची संमती
- कोविडच्या ओमिक्रॉनच्या आणि डेल्टा रुग्णांची त्सुनामी येण्याची भीती, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
- ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये ७० टक्के रुग्णालये भरली; नवीन वर्षाच्या स्वागतावर पडणार विरजण
- राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला, 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट