केसीआर हा 2जी पक्ष आहे, ओवेसींचा पक्ष 3जी आणि काँग्रेस 4जी पक्ष आहे, असंही शाह म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शाह म्हणाले की, तेलंगणातील निवडणुका तेथील लोकांचे आणि देशाचे भवितव्य ठरवतील. दीर्घ संघर्षानंतर राज्याची निर्मिती झाली. तेलंगणाचा अभिमान हा महत्त्वाचा मुद्दा होता, पण गेल्या काही वर्षांत बीआरएस आणि काँग्रेसने हा मुद्दा गायब केला. मागे वळून पाहिलं तर लक्षात येईल की, जिथे महसूल जास्त होता, तो आज कर्जबाजारी आहे. If you vote for Congress you will go to TRS BRS Amit Shahs statement in Telangana
JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
ते म्हणाले की, बीआरएस सरकारमधील घोटाळ्यांची यादी आहे. त्याची यादी संपत नाही. दारू घोटाळा, पूर मदत घोटाळा, जमीन घोटाळा, कलेश्वरम प्रकल्प घोटाळा हे विषय चर्चेत होते. गेल्या दशकात बीआरएसचे एकमेव काम घोटाळे करणे राहिले आहे. बीआरएसने राज्यात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांशिवाय काहीही केले नाही हे तेलंगणातील जनतेला कळून चुकले आहे.
याचबरोबर शाह म्हणाले की, जर त्यांनी काँग्रेसला मत दिले तर ते टीआरएस-बीआरएसकडे जाईल. हे सर्व घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत. केसीआर हा 2जी पक्ष आहे, ओवेसींचा पक्ष 3जी पक्ष आहे, काँग्रेस 4जी पक्ष आहे. येथे लोकशाही मूल्यांना स्थान नाही. निवडणुकीपूर्वी सगळे वेगळे होतात आणि निवडणुकीनंतर एकत्र येतात. शाह म्हणाले की, केसीआर सरकार जाण्याची वेळ आली आहे. भाजपचा विजय निश्चित आहे.
If you vote for Congress you will go to TRS BRS Amit Shahs statement in Telangana
महत्वाच्या बातम्या
- इस्रायली ओलीसांच्या सुटकेवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- इस्त्रायल अन् हमासमध्ये 49 दिवसांच्या युद्धानंतर, 4 दिवसांचा युद्धविराम!
- Rajasthan Election 2023 : जोधपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी छापली लग्नपत्रिकेसारखी निमंत्रण पत्रिका!
- पुढच्या 23 दिवसांत 35 लाख शुभमंगल सावधान; 4.25 लाख कोटींची उलाढाल!!