विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Upendra Dwivedi लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीगंगानगर जिल्ह्यातील २२ एमडी गावातील घडसाणा या सीमावर्ती भागाला भेट देऊन पाकिस्तानाला तीव्र इशारा दिला आहे. त्यांच्या शब्दांत, “ऑपरेशन सिंदूर २.० राबवले तर भारताने आधी दाखवलेला संयम राखणार नाही. यावेळी अशी कारवाई केली जाईल की पाकिस्तानला स्वतःला इतिहासात टिकवून ठेवायचे आहे की नाही, हा प्रश्न विचारावा लागेल. इतिहासजमा व्हायचे नसेल तर दहशतवाद संपवावा लागेल.”Upendra Dwivedi
द्विवेदी म्हणाले की, यदि पाकिस्तानने दहशतवादाला आश्रय देणे थांबवले नाही तर त्यांना नकाशावरून हटवण्याचीही ताकद भारताकडे आहे. त्यांनी लक्षात आणून दिले की ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, या हल्ल्यात शंभरांहून अधिक पाकिस्तानी सैन्यकर्मी आणि अनेक दहशतवादी मारले गेले. ऑपरेशन सिंदूरचे पुरावे भारताने जगासमोर मांडले आहेत, अन्यथा पाकिस्तानाने ह्या ठिकाणांची माहिती लपवली असती, असेही त्यांनी नमूद केले.Upendra Dwivedi
लष्करप्रमुख म्हणाले की ऑपरेशन सिंदूरचे नाव पंतप्रधानांनी दिले होते आणि ते महिलांसाठी समर्पित होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या या कारवाईला जगभरातून पाठिंबा मिळाला होता. त्या वेळी लष्कराने लक्षात ठेवले की निष्पाप नागरीकांना उद्देशून कोणतीही कारवाई होऊ नये, आमचे ध्येय फक्त दहशतवादी अड्डे, त्यांची प्रशिक्षण केंद्रे आणि त्यांचे प्रमुख नष्ट करणे होते.
परंतु आता परिस्थिती वेगळी असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले, आधी जे संयम दाखवला गेला तो यावेळी दिसणार नाही. त्यांनी पुन्हा सांगितले की, “जर भारताला जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करायचे असेल तर दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशांनी हे थांबवले पाहिजे.”
If we don’t want to become history, we have to end terrorism. Army Chief Upendra Dwivedi’s warning to Pakistan
महत्वाच्या बातम्या
- Israel : इस्रायलने गाझाकडे जाणारे 13 जहाज रोखले:ग्रेटा थनबर्गसह 150 जणांना अटक; 30 मदत जहाजे अजूनही मार्गावर
- सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती
- President Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले – भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, मी मोदींना ओळखतो, भारतीय अपमान सहन करत नाहीत
- Arun Lad : पुणे पदवीधर मतदारसंघात राजकीय खेळी ; शरद लाड यांचा भाजप प्रवेश ?