Thursday, 1 May 2025
  • Download App
    'जर जिवंत राहिलो तर...' भाजपचे फरिदकोटचे उमेदवार हंसराज हंस का झाले भावूक? |If I am alive then...is this the sentiment of BJPs Faridkot candidate Hansraj Hans

    ‘जर जिवंत राहिलो तर…’ भाजपचे फरिदकोटचे उमेदवार हंसराज हंस का झाले भावूक?

    म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी १५ मिनिटे माझी वाट पाहिली’


    विशेष प्रतिनिधी

    फरीदकोट : पंजाबमधील फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हंस राज हंस भावूक झाले. प्रचारादरम्यानच्या भाषणात हंसराज हंस म्हणाले की, ते हयात असतील तर 1 जूननंतर भेटू. आपल्या भावूक होण्याचे कारण त्यांनी न्यूज 18 ला सांगितले. ते म्हणाले की, ‘काल पंतप्रधान मोदींच्या सभेला पोहोचत असताना माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. आंदोलकांनी माझ्यावर तलवारी आणि दगडाने हल्ला केला. काही लोकांनी माझी गाडी फोडली. माझा सुरक्षा रक्षक जखमी झाला.If I am alive then…is this the sentiment of BJPs Faridkot candidate Hansraj Hans



    ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनीच मला वाचवण्याचे आदेश दिले होते. पोलिसांचा ताफा आला नसता तर काही घडले असते. पंतप्रधान मोदींनी १५ मिनिटे माझी वाट पाहिली. हंसराज हंस हे फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. रॅलीसाठी निघालेले फरीदकोटमधील भाजपचे उमेदवार हंसराज हंस यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी घेराव घातल्याची माहिती आहे.

    हंस राज हंस यांच्या आरोपांना शेतकरी नेते सुरजित सिंह फूल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आंदोलकांकडे शस्त्रे नसून झेंडे आहेत. त्यांना तिथून बाहेर काढणारे आम्हीच होतो. काहीही होऊ शकले असते. शेतकऱ्यांचा एवढा राग का आहे, याचाही त्यांनी विचार करायला हवा. मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी एका शेतकऱ्याने हंस यांच्या गाडीची मागील काच काठीने फोडली, हे सुदैवाने कारमध्ये बसलेल्या हंसराज हंस यांना दुखापत झाली नाही.

    If I am alive then…is this the sentiment of BJPs Faridkot candidate Hansraj Hans

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!