जगद्गुरू परमहंस आचार्य यांचे मोठे विधान!
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : Bangladesh अयोध्येतील तपस्वी छावणी मंदिराचे जगद्गुरू परमहंस आचार्य यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशात होत असलेल्या या हल्ल्यांमध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.Bangladesh
आचार्य परमहंस म्हणाले की, हिंदू बहिणी आणि मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत, जे असह्य आहे. बांगलादेशात हिंदू टिकले नाहीत तर तेथील मुस्लिमांचीही परिस्थिती संकटात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.
परमहंस आचार्य यांनी बांगलादेश सरकार, पंतप्रधान, न्यायालये आणि दहशतवाद्यांना वेळीच सावध व्हावे, असा इशारा दिला. ते म्हणाले, आम्ही मानवतावादी आहोत, मात्र तेथील हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत, तर सूड उगवला जाईल.
ते म्हणाले, “भारत सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंचे रक्षण करावे. हिंदू भगिनींवर आणि मुलींवर बलात्कार होत आहेत. जर तिथे हिंदू वाचणार नाहीत, तर मुस्लिमही वाचणार नाहीत. मला बांगलादेश सरकारला इशारा द्यायचा आहे. हा इशारा आहे. “पंतप्रधान असो की दहशतवादी, आम्ही मानवतावादी आहोत, पण हिंदूंवरील हल्ले थांबवले नाहीत, तर आमच्यावर जशास तसे उत्तर दिले जाईल. जर हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर बांगलादेशलाही तिरंगा झेंडा फडकवला जाईल.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील अल्पसंख्याकांविरुद्ध वाढत्या हिंसाचार आणि अतिरेकी वक्तृत्वावर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
If Hindus do not survive in Bangladesh Muslims will not survive either.
महत्वाच्या बातम्या
- Sadabhau Khot सदाभाऊ खोतांचा बाबा आढावांना सवाल- मुस्लिमबहुल भागात महायुतीला कमी मते मिळतात, तिथे EVM मविआसाठीच कसे सेट होते?
- Manoj Jarange : भाजप महायुतीला कौल देऊन जनतेने दाखवली सत्तेची दिशा; पण जरांगेंची सरकारच्या मुंडक्यावर पाय द्यायची भाषा!!
- Haryana government गायी पाळणाऱ्यांना ‘हे’ सरकार देत आहे 30 हजार रुपये
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांवरील हल्ल्याच्या घटनेवर भाजपचा मोठा दावा!