• Download App
    I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश - उत्तर प्रदेशात सुरुंग; काँग्रेसने आधी सांगितले असते, तर त्यांच्याशी चर्चाच केली नसती; अखिलेश यादवांचे वक्तव्य If Congress had said earlier, they would not have discussed with him

    I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश – उत्तर प्रदेशात सुरुंग; काँग्रेसने आधी सांगितले असते, तर त्यांच्याशी चर्चाच केली नसती; अखिलेश यादवांचे वक्तव्य

    वृत्तसंस्था

    लखनौ : फार मोठा गाजावाजा करून मोदी सरकारच्या विरोधात बनवलेल्या काँग्रेस प्रणित I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरुंग लागला आहे. If Congress had said earlier, they would not have discussed with him

    काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला आश्वासन देऊन देखील एकही जागा सोडली नाही. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यादव यांनी I.N.D.I आघाडीलाच दोन्ही राज्यांमध्ये सुरुंग लावून टाकला आहे. मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्र्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली होती. समाजवादी पार्टीला 6 जागा सोडण्याची त्यांनी तयारी दाखविली होती, पण प्रत्यक्षात काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये समाजवादी पार्टीला एकही जागा सोडली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अखिलेश यादव संतप्त झाले.

    कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये I.N.D.I आघाडी अस्तित्वातच नाही, हे काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आधी सांगितले असते, तर आम्ही उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात त्यांच्याशी चर्चा करायला पुढेच आलो नसतो. आमचा वेळ वाया घालवला नसता, असे संतप्त उद्गार अखिलेश यादव यांनी काढून दोन्ही I.N.D.I आघाडीला सुरुंग लावून मोकळे झाले.

    केंद्रातले मोदी सरकार हटवण्यासाठी काँग्रेस आमची मदत मागते आणि राज्यांमध्ये आम्हाला बाजूला काढते हे आम्हाला चालणार नाही, असा गंभीर इशारा अखिलेश यादव यांनी दिला. काँग्रेसच्या कृती मधून आणि अखिलेश यादव यांच्या वक्तव्यातून I.N.D.I आघाडीला मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशात समाजवादी पार्टी आता 50 पेक्षा जास्त उमेदवार काँग्रेस विरोधात उभे करणार आहे.

    If Congress had said earlier, they would not have discussed with him

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Abu Dhabi : इस्रायल-इराण युद्ध, अबू धाबीमध्ये इराणी हल्ल्यात भारतीय जखमी; दूतावासाने म्हटले- ते आता धोक्याबाहेर आहेत, भारतात 15 हून अधिक शहरांमध्ये निदर्शने

    T20 World Cup 2026 : भारत टी-20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये; 5 मार्चला इंग्लंडशी भिडणार, वेस्ट इंडीजचा 5 विकेट्सनी पराभव; सॅमसनच्या नाबाद 97 धावा

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली