• Download App
    Amit Shah 'पाकिस्तानी नागरिकांना ओळखा अन् त्यांना परत पाठवा'

    Amit Shah ‘पाकिस्तानी नागरिकांना ओळखा अन् त्यांना परत पाठवा’

    गृहमंत्री अमित शहा यांचे प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश

    विशेष प्रतिनिधी

     

    नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री शाह यांनी शुक्रवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांना त्यांच्या संबंधित राज्यातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यास सांगितले. यासोबतच, त्यांनी सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

    पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व प्रकारचे व्हिसा तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाह यांनी सर्वच मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी नागरिकांना लवकर मायदेशी पाठवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले.

    केंद्रीय गृहमंत्री त्यांच्या निवासस्थानी सिंधू पाणी करारावर बैठकही घेणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांच्याव्यतिरिक्त इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याबद्दल पाकिस्तानला औपचारिकपणे लेखी कळवले आहे. भारताने करारात सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली आहे. पत्रात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारला करारात सुधारणा करण्याची सूचना दिली आहे. या सूचनेत असे नमूद केले आहे की कराराचे अनेक मूलभूत पैलू बदलले आहेत आणि त्यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.

    Identify Pakistani citizens and send them back Amit Shah instructs Chief Ministers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Election Commission : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘स्टार’ प्रचारकांची मर्यादा दुप्पट

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भारतातील मुस्लिम-ख्रिश्चनांचे पूर्वज हिंदू; कदाचित ते विसरले असतील; संघाचे एकमेव उद्दिष्ट समाजाला एकत्र करणे

    RSS Chief Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- केवळ कायद्यांनी समाज मजबूत होत नाही, लोकांमध्ये संस्कृतीशी आपलेपणाची भावना असणे महत्त्वाचे