अग्निवीरच्या शहीद जवानाला एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाते, असंही राजनाथ सिंह म्हणाले..
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, मोदी सरकार अग्निवीरला शहीद दर्जा देत नाही. त्यांना भरपाई दिली जात नाही. काँग्रेस आली तर अग्निवीर योजना बंद करू. अग्निवीर ही लष्कराची नसून पीएमओची योजना आहे. त्यांच्यासाठी अग्निवीर हा वापरा आणि फेका मजूर आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निवीर शहीदांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जाते. राहुल गांधींनी अग्निवीरवर चुकीचे वक्तव्य करू नये. ते सभागृहाची दिशाभूल करत आहेत.I should not lose my direction regarding Agniveer Rahul Gandhis reply to Rajnath Singh
राहुल गांधींच्या विधानावरून आज लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला आणि म्हटले की, स्वतःला हिंदू म्हणवणारे नेहमीच ‘हिंसा आणि द्वेष पसरवण्यात’ गुंतलेले असतात, ज्याचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र, राहुल गांधी यांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले की ते भाजपबद्दल बोलत आहेत. भाजप, नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही.
राहुल गांधी यांनी सभागृहात अनेकवेळा भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि ते आम्हाला अहिंसा आणि निर्भयतेचा संदेश देतात असे सांगितले. त्यांनी इस्लाम, ख्रिश्चन आणि जैन धर्माच्या शिकवणुकीबद्दलही सांगितले. सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना राहुल म्हणाले की, सर्व धर्म आणि आपल्या सर्व महापुरुषांनी अहिंसा आणि निर्भयतेबद्दल सांगितले आहे. ते म्हणायचे घाबरू नका.
शिवजी महाराज म्हणतात घाबरू नका, घाबरू नका, घाबरवू नका. ते अहिंसेबद्दल बोलले. मात्र स्वत:ला हिंदू म्हणवणारे २४ तास हिंसा, द्वेष, असत्य यावर बोलतात. यावर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आपापल्या जागी उभे राहून जोरदार निदर्शने करू लागले. त्यावर राहुल म्हणाले की, तुम्ही मुळीच हिंदू नाही. सत्याच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, सत्यापासून मागे हटू नये, असे हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिलेले आहे.
I should not lose my direction regarding Agniveer Rahul Gandhis reply to Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- राधाराणी वादप्रकरणी पं. प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी, दुसऱ्याला म्हटले होते राधाचा पती
- केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात राहणार; मद्य धोरणप्रकरणी CBIने केली होती अटक
- T20 world cup 2024 winner : टीम इंडियाने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवले, सूर्याच्या एका कॅचने फिरवली मॅच
- चेहऱ्याचा मुद्दा राऊतांनी घट्ट धरला; पवारांना बाजूला सारून राहुलच्या नावाने गूळ लावला!!