• Download App
    Husband gave triple talaq मोदी, योगी यांचे कौतुक केले

    triple talaq : मोदी, योगी यांचे कौतुक केले म्हणून पतीने दिला ‘तिहेरी तलाक’

    triple talaq

    एवढंच नाहीतर त्या पतीने संबंधित महिलेस जाळण्याचाही प्रयत्न केला


    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्याबद्दल तिच्या पतीने मुस्लिम महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिहेरी तलाक दिला.

    बहराइच येथील रहिवासी असलेल्या मरियम यांचा विवाह अयोध्येतील रहिवासी अर्शदशी डिसेंबर २०२३ मध्ये झाला होता. दोघेही एकत्र राहत होते आणि सर्व काही ठीक चालले होते. मरियमला ​​तिचे सासरचे घर अयोध्या आवाडायचे तेथील वातावरण पाहून ती खूप खुश होती. मरियमने अयोध्येतील वातावरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. मात्र या गोष्टीने तिचा पती अर्शद चांगलाच नाराज झाला. रागाच्या भरात त्याने मरियमवर गरम डाळ फेकली. यानेही त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्याने आपल्या पत्नीला तिहेरी तलाकही दिला.



    मरियम म्हणाली, मी गावची रहिवासी आहे. अयोध्या शहरात आल्यावर मला खूप बरे वाटले. म्हणूनच मी माझ्या पतीकडे मोदी आणि योगी यांचे कौतुक करत होते. याचा राग येऊन त्याने माझ्याशी भांडण केले आणि मला घराबाहेर हाकलून दिले. लोकांनी शांतता केली आणि मला माझ्या पतीकडे परत पाठवले पण त्याने मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्यावर गरम डाळ टाकून मला जाळण्याचा प्रयत्न केला आणि तिहेरी तलाक दिला.

    तिने कोणताही गुन्हा केलेला नाही, असे मरियम चे म्हणणे आहे. तुम्ही तुमच्या देशाचे पंतप्रधान आणि तुमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे, तुम्ही कोणतेही पाप केलेले नाही. मरियम आता न्यायाची याचना करत आहे.

    Husband gave triple talaq for praising Modi Yogi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??