वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीचे हेलकावे खात असताना इतर मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सकारात्मक आहे, याचे प्रत्यंतर आज समोर आले.How much did India’s exports increase? How much did imports decrease
भारताची निर्यात किती वाढली? आणि आयात किती कमी झाली?, यांची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने जारी केली. मे 2025 पर्यंत माल आणि सेवा क्षेत्रातील भारताची निर्यात 71.12 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली. जी मे 2024 मध्ये 69.20 अब्ज डॉलर्स इतकी होती.
त्या तुलनेत भारताची आयात याच कालावधीत 78.55 अब्ज डॉलर्स वरून 77.75 डॉलर्स पर्यंत कमी झाली.
मे 2024 मध्ये भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारी तूट 9.35 अब्ज डॉलर्सची होती. ती मे 2025 मध्ये घटून 6.62 अब्ज डॉलर्स पर्यंत कमी झाली.
चीन, अमेरिका, जर्मनी आणि जपान यांच्यासारख्या जागतिक अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत असताना भारताने आपली अर्थव्यवस्था स्थिर राखली आणि व्यापारी तूट देखील घटवली त्याचबरोबर निर्यात वाढवून आयात कमी केली हे भारतीय अर्थव्यवस्थेचे यश मानले जात आहे.
How much did India’s exports increase? How much did imports decrease?; Read the statistics carefully!!
महत्वाच्या बातम्या
- NIA raids राजस्थान, मध्य प्रदेशातील दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर एनआयएने छापेमारी
- Chirag Paswan : चिराग पासवान बिहार विधासभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार?
- Vijay Rupani : विजय रुपानींचा DNA जुळला; जाणून घ्या, अंतिम संस्कार कधी अन् कुठे होणार?
- वयाच्या मुद्द्यावर अजितदादांची चंद्रराव तावरेंवर टीका; पण आधी त्यांनीच काढल्या होत्या चंद्ररावांच्या नाकदुऱ्या!!