• Download App
    How many officers work in PMO, what is the annual budget, got 'this' answer in RTI

    PMO मध्ये किती अधिकारी काम करतात , वार्षिक बजेट काय आहे, RTI मध्ये मिळाले ‘ हे ‘ उत्तर 

    पंतप्रधान कार्यालय सर्वात महत्वाचे मानले जाते. भारतासारख्या लोकशाहीत पंतप्रधानांचे पद सर्वात महत्वाचे आहे. 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी पंतप्रधानांना पाठिंबा देण्यात विशेष भूमिका बजावतात, म्हणूनच पंतप्रधान कार्यालय सर्वात महत्वाचे मानले जाते. भारतासारख्या लोकशाहीत पंतप्रधानांचे पद सर्वात महत्वाचे आहे.  How many officers work in PMO, what is the annual budget, got ‘this’ answer in RTI

    भारतातील पंतप्रधान कार्यालयात काम करणारे कर्मचारी विशेष भूमिका बजावतात. आणि काय कारण आहे  ज्यामुळे पंतप्रधान कार्यालय सर्वात महत्वाचे मानले जाते.  या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी इंडिया टुडेने आरटीआय दाखल करून प्रश्न विचारला की पीएमओमध्ये किती  विभाग आहेत? पीएमओमध्ये किती लोक कार्यरत आहेत? विभागासाठी किती बजेट आहे?



    या प्रश्नांची उत्तरे भारत सरकारने दिली आहेत की, पंतप्रधान कार्यालय ‘भारत सरकार विभाग’ अंतर्गत काम करते. यासाठी पीएमओ अंतर्गत स्वतंत्र विभाग नाही. तर एकूण 301 लोक PMO कार्यालयात काम करतात . बजेट बद्दल विचारलेल्या प्रश्नात, असे सांगितले गेले आहे की बजेट केंद्रीय गृह मंत्रालयाने मुख्य कार्यालयात दिले आहे.

    जर तुम्हाला वर्षानुवर्ष बजेट जाणून घ्यायचे असेल तर https://mha.Rov.in/divisionofmha/finance-division यावर जाऊन चेक करा. भारतातील बहुतांश लोकांना माहिती नसेल की PMO चे बजेट गृह मंत्रालयाकडून देखील दिले जाते. जेव्हा दिल्या गेलेल्या लिंक वर जाऊन तपास केला गेला तेव्हा अशी माहिती मिळाली की या आर्थिक वर्षासाठी 58 कोटींचे बजेट प्रदान करण्यात आले आहे .

    How many officers work in PMO, what is the annual budget, got ‘this’ answer in RTI

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये