• Download App
    Bangladesh बांगलादेशातून हिंदूं संपण्याच्या मार्गावर?

    Bangladesh : बांगलादेशातून हिंदूं संपण्याच्या मार्गावर?

    Bangladesh

    राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष ‘हा’ शब्द काढून टाकण्याची तयारी


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Bangladesh बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार शिगेला पोहोचले आहेत. आता असेच काही बांगलादेशात घडणार आहे, की तिथे हिंदूंच्या अंताची उलटी गिनती सुरू झाली आहे. बांगलादेशात राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकल्याची चर्चा आहे. असे झाले तर बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनेल. ९० टक्के मुस्लिम असताना धर्मनिरपेक्षतेची गरजच काय, असा दावा केला जात आहे. बांगलादेशात निर्माण होणाऱ्या या मागणीचा अर्थ काय आणि भविष्यात भारतातही असेच काही पाहायला मिळेल का?Bangladesh



    बांगलादेशच्या राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकण्याची बाब म्हणजे युनूस सरकारवर कट्टरतावादाचे किती वर्चस्व आहे याचा पुरावा आहे. युनूस सरकारने सेक्युलर या शब्दाबाबत तिथल्या कोर्टात मोठं विधान केलं. बांगलादेशचे ॲटर्नी जनरल मोहम्मद असदुझ्झमन यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, त्यांच्या देशाला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही. धर्मनिरपेक्षतेसोबतच बांगलादेशच्या राज्यघटनेतून बंगाली राष्ट्रवाद काढून टाकण्याची चर्चा आहे. 2011 मध्ये तत्कालीन शेख हसीना सरकारने बांगलादेशला धर्मनिरपेक्ष देश घोषित केले होते.

    राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकल्यास बांगलादेश १०० टक्के मुस्लिम राष्ट्र होईल. ज्या देशांमध्ये मुस्लीम लोकसंख्या ५० ते ६० टक्क्यांची पातळी ओलांडते अशा देशांमध्ये हे अनेकदा घडते. धर्मनिरपेक्षता हा एक शक्तिशाली शब्द आहे, ज्याचा समावेश देशाच्या घटनेत सर्व धर्मांना सर्व धार्मिक स्वातंत्र्य दिलेला आहे, परंतु बांगलादेशच्या राज्यघटनेतून हा शब्द सेक्युलर काढून टाकल्याच्या चर्चा आहेत. यावरून बांगलादेशात इस्लामिक क्रांतीच्या नावाखाली इतर धर्मीयांचा नायनाट करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Hindus in Bangladesh on the way to extinction

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amazon : ॲमेझॉनने आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले, बंगळुरूत 11 लाख स्क्वेअर फूटमध्ये 12 मजली कॅम्पस

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा सवाल- NOTAचा काय फायदा? नेत्यांची गुणवत्ता सुधारली का, एकच उमेदवार असताना हे गरजेचे आहे का?

    DGCA : डीजीसीएचा निर्णय- अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआरच्या 4 विमानांवर उड्डाणबंदी