आणखी 10 आमदार संपर्कात असल्याचंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. एनडीटीव्हीशी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारच्या कृतीमुळे काँग्रेस पक्षाचे आमदार संतापले आहेत. त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत मिळाला. तसेच वैयक्तिकरित्या माझे या आमदारांशी चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी मला मतदान केले. तुम्ही उभे राहाल तर या सरकारच्या विरोधात मतदान करू, असे आमदार म्हणाले होते.Harsh Mahajans claim that the BJP government will soon be formed in Himachal
हर्ष महाजन म्हणाले की, जेव्हापासून राम मंदिर बांधले गेले, तेव्हापासून काँग्रेस सर्वत्र माघार घेत आहे. राम मंदिराच्या उभारणीपासून वातावरण पूर्णपणे बदलले आहे. लोकांना मोदींशी जुडायचे आहे. मोदी हे कार्यरत पंतप्रधान आहेत.
हर्ष महाजन म्हणाले की, इतर आमदारांनाही आता धीर आला आहे. हे सरकार जाणार आहे, असा विचार इतर आमदारही करत आहेत. 10 आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्या सर्व आमदारांना काँग्रेस सरकारपासून स्वातंत्र्य मिळवायचे आहे. हिमाचलमध्ये लवकरच भाजपचे सरकार येणार आहे, हे मला समजले आहे. हर्ष महाजन म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केलेल्या 6 आमदारांव्यतिरिक्त माझ्या संपर्कात 10 आमदार आहेत.
Harsh Mahajans claim that the BJP government will soon be formed in Himachal
महत्वाच्या बातम्या
- शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- वाजवा तुतारी, गाडा गद्दारी; मात्र बारामतीत व्हायरल केले पत्र “निनावी”!!
- सीबीआयने अखिलेश यादव यांना पाठवले समन्स
- केंद्रात महाराष्ट्रातलेच कृषिमंत्री असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पॅकेज मधल्या मध्ये लुटले जायचे; यवतमाळ मधून मोदींचा हल्लाबोल!!