• Download App
    ज्ञानवापी मशीद मराठ्यांच्या पराक्रमाने तेव्हाच उद्धवस्त झाली असती...Gyanvapi Masjid would have been destroyed only by the power of Marathas then ...

    ज्ञानवापी मशीद मराठ्यांच्या पराक्रमाने तेव्हाच उद्धवस्त झाली असती…

    प्रतिनिधी

    वाराणसी : सध्या ज्ञानवापी मंदिराच्या सर्वेक्षण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुरु आहे. या सर्वेक्षणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी ही मशीद आहे, त्याठिकाणी आधी शिव मंदिर होते, असा दावा हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. ज्ञानवापीतील वजूखान्यात तर थेट शिवलिंग आढळल्या आढळले आहे ती जागा आता संरक्षित केली आहे पण काशी विश्वनाथ मुक्ततेचे स्वप्न आणि महत्त्वाकांक्षा मराठ्यांनी बाळगल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांची यामागे उत्तुंग प्रेरणा होती मराठ्यांच्या पराक्रमाने खरे म्हणजे अठराव्या शतकातच ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त झाली असती Gyanvapi Masjid would have been destroyed only by the power of Marathas then …

    मात्र १७व्या शतकातच ही मशीद जमीनदोस्त झाली असती, परंतु हिंदूंनी औरंगजेबाकडून होणाऱ्या कत्तलीच्या भीतीने यापासून माघार घेतली होती.



    २० हजार सैन्य घेऊन आलेले मल्हारराव होळकर 

    ज्ञानवापी मशीद पाडून त्याठिकाणच्या शिव मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्रातील मल्हारराव होळकरांनी प्रयत्न केले होते. त्यासंबंधीचा उल्लेख शिवचरित्रकार डॉ. शिवरात्न शेटे यांनी केला आहे. औरंगजेब हा मूळात धर्मवेडा आणि धर्मांध होता. सन 1666 नंतर त्याचे धर्मवेड आणखी वाढले. कारण 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमातून आणि राजकीय चतुराईने आग्र्याहून सुटका करवून घेतली होती.

    यातून औरंगजेब धर्मवेड अधिक वाढले आणि 9 एप्रिल 1669 रोजी त्याने एक फतवा काढून हिंदू देवालय विध्वंस करण्याचा आदेश त्याने दिला होता. काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून औरंगजेबाने ज्ञानवापी मशीद उभारली होती. ती मशीद पाडून काशीतील मंदिराच्या पुर्नबांधणीसाठी 27 जुन 1742 मल्हारराव होळकर 20000 सैनिक घेऊन काशीत पोहोचले. परंतु स्थानिक पुरोहितांनी त्यांना विनंती केली की, आपण मशीद पाडून येथे पुर्नबांधणी केल्यानंतर पुन्हा एकदा औरंगेजेब आणि मुघल आमचा कतलेआम करतील, या भीतीने त्यांनी मल्हाररावांना थांबवले. मल्हाररावांनी पुरोहितांच्या विनंतीला मान दिला आणि त्यांच्या सैन्याने ज्ञानवापी मशिद उध्वस्त केली नाही.

    मात्र, त्यांच्या नंतर दुसरा प्रयत्न अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धाराचा करण्याचा केला होता. इतकेच काय तर महादजी शिंदे घराण्याच्या सुनबाई बैजाबाई शिंदे यांनी तेखे ज्ञानवापी मंडप बांधला. देव देश अन धर्मासाठी राबलेल्या मराठ्यांच्या तलवारीचा असा देदीप्यमान इतिहास आहे!!

    Gyanvapi Masjid would have been destroyed only by the power of Marathas then …

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan drones : पाकिस्तानचे सर्व ड्रोन उद्ध्वस्त, १०० हून अधिक दहशतवादी ठार

    Karachi port : कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी भारतीय नौदल होते सज्ज

    ‘सर्व भारतीय वैमानिक परतले आहेत’, ऑपरेशन सिंदूरवर एअर मार्शलचे मोठे विधान