विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोनामुळे केंद्र सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीमची (ईसीएलजीएस) व्याप्ती वाढविली असून या कर्ज योजनेचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत किंवा तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप होईपर्यंत राहणार आहे, सरकारच्या या निर्णयामुळे व्यक्ती; तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे. Govt. will support MSME by package
केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने विस्तारित ‘ईसीएलजीएस ४.०’चा आराखडा जाहीर केला आहे. सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मदत म्हणून, तसेच रोजगार सुरक्षित राहावेत, व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरळीतपणे सुरु करता यावे आणि अत्यावश्यक आरोग्यसेवांसाठी पुरेसे अर्थसाह्य पुरविण्यासाठी ‘ईसीएलजीएस’मध्ये बदलांची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
कोरोनाच्या साथीचा फटका साऱ्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सरकार त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. छोट्या उद्योगांना मदत करण्याच्या हेतूने सरकारने हे पाउल उचलले असून त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.
Govt. will support MSME by package
महत्त्वाच्या बातम्या
- सलमानचे करीअर संपवून त्याला रस्त्यावर आणील, कमाल आर खान याची धमकी
- अशोक चव्हाण म्हणाले , नितीन गडकरी चुकीच्या पक्षात, त्यांचे पंख छाटले जात आहेत
- महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळेना, केंद्राकडून आणि उत्तर प्रदेशात पत्रकारांना आर्थिक मदत देणे सुरूही
- नवीन पटनाईक यांनी ओडिशाची ओळख बदलली, सर्वाधिक गरीब राज्य ते संकटाशी यशस्वी मुकाबला, आता आपत्तीशी लढण्यासाठी घर घर योध्दा
- लॉकडाऊन सदृश्य निर्बंध पुन्हा वाढविले; मात्र पॉझिटिव्हिटी दर कमी असल्यास दुकानांच्या वेळा दुपारी दोनपर्यंत
- केंद्र सरकार जुलैअखेरपर्यंत २० ते २५ कोटी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस मिळविणार; दरमहा संख्येत वाढही करणार