विशेष प्रतिनिधी
लखनौ : यूपीमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन विक्रम करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आलेली मोफत रेशन योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी रेशन मार्च २०२२ पर्यंत सुरू राहणार होते. Free ration scheme extended for three months; The first decision of the Yogi Adityanath government
माध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील ८० कोटी गरीब आणि राज्यातील १५ कोटी गरीबांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आमच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत ही योजना आणखी तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गरिबांना अन्नधान्याबरोबरच डाळी, मीठ, साखर आणि तेलही दिले जाणार आहे.
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ३२७० कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयानंतर राज्यातील १५ कोटी जनतेला पुढील तीन महिने प्रधानमंत्री अन्न योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह हेही उपस्थित होते. नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा हा पहिला निर्णय आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी ५२ कॅबिनेट मंत्र्यांसह शपथ घेतली. यूपी निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या निवडणुकांतील विजयाचे प्रमुख कारण मोफत रेशन योजना हे सांगितले जात आहे, हे लक्षात घेऊन सरकार ही योजना सुरू ठेवण्याच्या बाजूने आहे. राज्य सरकार आता २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. २०२४ च्या निवडणुकीपर्यंत ही योजना सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
Free ration scheme extended for three months; The first decision of the Yogi Adityanath government
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये महिला क्लर्कने लाच मागितल्याची तक्रार, मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या दिल्या सूचना
- अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण; तातडीने सीमाप्रश्न सोडविण्याचा आग्रह
- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर उलटला; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या रांगा
- आमने सामने : फारुख अब्दुल्लाचा स्वतःला निर्दोष दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न पल्लवी जोशींनी हाणून पाडला ..म्हणाल्या २दिवस आधी राजीनामा अन् लंडन वारी हा योगायोग नव्हे ….
- कामावर हजर व्हा,एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा अखेरचा इशारा : ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा
- स्वाभिमानी पक्षाच्या एकमेव आमदाराला डच्चू; सक्रिय नसल्याने पक्षातून केली हकालपट्टी