Friday, 9 May 2025
  • Download App
    नालंदामध्ये माजी केंद्रीयमंत्री आरसीपी सिंह यांच्या नातेवाईकास घरातून बाहेर बोलावून गोळ्या झाडल्या! Former Union Minister RCP Singh relative was called out of the house and shot in Nalanda

    नालंदामध्ये माजी केंद्रीयमंत्री आरसीपी सिंह यांच्या नातेवाईकास घरातून बाहेर बोलावून गोळ्या झाडल्या!

    जाणून घ्या, हल्लेखोरांनी नेमकी काय धमकी देऊन गोळ्या झाडल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नालंदा : सिलाव पोलीस स्टेशन हद्दीतील धरहरा गावात रविवारी (३ सप्टेंबर) रात्री बदमाशांनी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांचे नातेवाईक पिंटू सिंग यांना त्यांच्या घरातून बोलावून त्यांच्या छातीत गोळ्या झाडल्या. गोळीबाराचे वृत्त कळताच परिसरात आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी तरुणाला उपचारासाठी सदर रुग्णालयात पाठवले. Former Union Minister RCP Singh relative was called out of the house and shot in Nalanda

    रविवारी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांचे मूळ गाव मुस्तफापूर येथे अस्थान विधानसभेची बैठक झाली. आरसीपी सिंग यांचे नातेवाईक पिंटू सिंग यात सहभागी झाले होते. बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर पिंटू सिंग आपल्या गावी धरहराला परतले. यानंतर पिंटू सिंगला त्याच्या घराजवळ गोळ्या घातल्या.

    या घटनेबाबत माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली की, ही गोळीबाराची घटना राजकीय कटाचा भाग म्हणून घडवून आणण्यात आली. या घटनेसाठी त्यांनी थेट जेडीयूला जबाबदार धरले आहे. गोळी झाडलेली व्यक्ती जेडीयू नेता असल्याचे सांगण्यात आले.

    आरसीपी सिंह म्हणाले की, माझे नातेवाईक पिंटू सिंग अस्थानन विधानसभेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आले होते. सभेला उपस्थित राहून ते गावी परतले होते. आरसीपी सिंग म्हणाले की, पिंटू सिंग आमच्यासोबत राहतो आणि काम करतो म्हणून त्याला गोळी लागली आहे. ज्याने गोळी झाडली त्याने आरसीपी सिंगला सोडून जाण्याची धमकी देऊन गोळ्या झाडल्याचंही जखमी तरुणानं म्हटलं आहे.

    Former Union Minister RCP Singh relative was called out of the house and shot in Nalanda

    Related posts

    राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार अन् सशस्त्र दलांसोबत उभा – आरएसएस

    Operation sindoor : भारतीय सैन्य दले आणि भारतीय नेतृत्वाचे संघाकडून अभिनंदन आणि देशवासीयांना आवाहन!!

    भारतीय सैन्याच्या विजयाची पुरोगामी इस्लामिस्टांना धास्ती; म्हणून पाकिस्तानच्या बचावासाठी करताहेत “बौद्धिक कसरती”!!