‘तुम्हाला कोणत्या प्रकारचे नाते हवे आहे… ते तुम्हीच ठरवा’ असं एस जयशंकर म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jaishankar शेख हसीना देश सोडून गेल्यापासून आणि मुहम्मद युनूस सत्तेत आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्याचवेळी, बांगलादेशचे अंतरिम सरकार भारताशी संबंध आणखी बिघडवण्यात कोणतीही कसर सोडताना दिसत नाही.Jaishankar
अलिकडेच ओमानमध्ये, भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट घेतली. पण बांगलादेशमध्ये सुधारणा होत नाही. बैठकीनंतर जवळपास एक आठवड्यानंतर, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बांगलादेशच्या शत्रुत्वपूर्ण वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.
- Prime Minister Modi पंतप्रधान मोदींनी भाजपच्या आमदार, खासदारासंह पदाधिकाऱ्यांना दिला मंत्र, म्हणाले…
परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, बांगलादेशला आपल्याशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवायचे आहेत हे ठरवावे लागेल? १९७१ पासून बांगलादेश आणि आपला एक खास इतिहास आहे. एस जयशंकर यांनी सांगितले की, बांगलादेश असे म्हणू शकत नाही की त्यांना भारताशी चांगले संबंध हवे आहेत आणि दुसरीकडे ते तिथे घडणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला दोष देत राहतात.
ते म्हणाले की, अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. बांगलादेशला या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, जर तुम्ही अहवाल पाहिला तर अनेक गोष्टी अत्यंत हास्यास्पद आहेत.
Foreign Minister Jaishankar gives ultimatum to Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- Prime Minister Modi पंतप्रधान मोदींनी भाजपच्या आमदार, खासदारासंह पदाधिकाऱ्यांना दिला मंत्र, म्हणाले…
- महाराष्ट्राच्या राजकारणातले “हलके” आणि “जड”; पण दिल्लीत रेटून जम बसवलेल्या गुजरात्यांपुढे सगळेच शरण!!
- मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली; पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर तोफ डागली!!
- Atishi : आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड, दिल्ली विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू