विशेष प्रतिनिधी
कानपुर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता आयआयटी कानपूर पासआउट विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणार आहे. D2C वेलनेस कंपनी https://phool.co/ एक स्टार्टअप कंपनी आहे. 2017 मध्ये आय आय टी कानपुर मधून अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या अंकित अग्रवालने ही कंपनी स्थापन केली आहे. टाकाऊ, सुकलेली फुले ही सर्क्युलॅर इकॉनॉमिक सिस्टिम चा भाग असू शकतात हा अनोखा विचार तिच्या डोक्यात आला नाही तिने ही कंपनी सुरू केली.
Flower Recycling! Alia bhatt invests in eco friendly start up started by iit Kanpur alumni
फुलांच्या कचऱ्यापासून चारकोल फ्री सुगंधीत उत्पादने तयार करणे. अश्या पर्यावरण पूरक, प्रदूषण विरहीत तंत्रज्ञानाचा उपयोग निरोगी उत्पादने निर्माण करण्यासाठी केला जातो. ह्या फ्लॉवर रिसायकलिंग तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ‘फ्लेदर’ हे प्राण्यांच्या चामड्यासाठी हा एक पर्याय निर्माण केला गेला आहे. ज्याची नोंद PETA ने देखील घेतली होती तर सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते.
ही कंपनी सुरू करण्यासाठी अंकिताने IAN फंड, सोशल अल्फा (FISE) आणि ड्रॅपर रिचर्ड्स कपलान फाउंडेशन (सॅन फ्रान्सिस्को) आणि IIT कानपूर यांच्याकडून $ 2 दशलक्ष इतका निधी उभा केला होता. ‘https://phool.co/ मध्ये आमचे ध्येय इनोव्हेशनद्वारे बदल घडवून आणणे, हेच आमचे ध्येय आहे.’ असे https://phool.co/ ची संस्थापक अंकित अग्रवाल म्हणते. “आलियाची गुंतवणूक ही आमच्या प्रयत्नांची पुष्टी आहे आणि आम्हाला जागतिक पातळीवर ह्या इनोव्हेशन द्वारे एक वेगळी यशोगाथा तयार करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळते आहे. असेही अंकिता म्हणाली.
फुलांपासून धूप आणि बायो-लेदर बनवणे, ज्यामुळे नद्या स्वच्छ ठेवण्यास मदत होते आहे. लेदरला पर्याय निर्माण झाला आहे. भारताच्या मध्य प्रदेशातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यास ही कंपनी मोलाचं योगदान देत आहे. त्यामूळे ह्या कंपनी मध्ये गुंतवणूक करताना मला निश्चितच आनंद होत आहे असे आलिया भट यावेळी बोलताना म्हणाली होती.
या वर्षाच्या सुरुवातीला, आलिया भट्टने Nykaa मध्ये गुंतवणूक केली होती.
Flower Recycling! Alia bhatt invests in eco friendly start up started by iit Kanpur alumni
महत्त्वाच्या बातम्या
- आता मुलीही लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी , पुढील सत्रापासून प्रवेश सुरु
- युपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर मिळवलेल्या डॉ. अपला मिश्राने मुलाखतीत ‘ही’ उत्तरे दिली होती
- मेनका गांधी वरुण गांधी यांनी भाजप बाहेरची वाट पकडली??; राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळले
- भाजपची ८१ जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातून गडकरी, गोयल, फडणवीस, चंद्रकांतदादा, विजया रहाटकर, मुंडे, तावडे