Jaipur court : बलात्कार पीडितांना देशात न्याय मिळण्यासाठी बराच वेळ लागतो, पण जयपूर कोर्टाने बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला फक्त 9 दिवसांत शिक्षा सुनावून एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. 26 सप्टेंबर रोजी जयपूरच्या कोटखवडा परिसरात 9 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी घटनेच्या 13 तासांच्या आत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी 24 तासांत आरोपींविरोधात न्यायालयात चालानही सादर केले होते. 4 दिवसांत एकूण 28 तासांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला. first time in india fifth day of trial in rape case Jaipur court sentenced criminal to 20 years
प्रतिनिधी
नवी दिल्ली : बलात्कार पीडितांना देशात न्याय मिळण्यासाठी बराच वेळ लागतो, पण जयपूर कोर्टाने बलात्कार प्रकरणात गुन्हेगाराला फक्त 9 दिवसांत शिक्षा सुनावून एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. 26 सप्टेंबर रोजी जयपूरच्या कोटखवडा परिसरात 9 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी घटनेच्या 13 तासांच्या आत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी 24 तासांत आरोपींविरोधात न्यायालयात चालानही सादर केले होते. 4 दिवसांत एकूण 28 तासांच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला ऐतिहासिक निकाल दिला.
दरम्यान, पीडिता अद्याप जयपूरिया रुग्णालयात दाखल आहे. कोर्टात आणता येईल अशी तिची स्थिती नव्हती. त्यामुळे न्यायालयाने केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीडितेचा जबाब नोंदवला. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजता न्यायाधीशांनी आरोपीला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
केवळ 9 दिवसांत निकालाची देशातील पहिलीच घटना
देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, जिथे एका निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याच्या चार दिवसांच्या खटल्यानंतर आरोपीला पाचव्या दिवशीच शिक्षा सुनावण्यात आली. मुलीला न्याय मिळवून देण्यात मुख्य भूमिका दक्षिण जिल्हा, POCSO कोर्ट, विशेष सरकारी वकील, FSL टीम, डॉक्टर आणि जयपूर पोलीस आयुक्तालयातील तपास यंत्रणांच्या 150 पोलिसांनी बजावली आहे.
26 सप्टेंबर रोजी झाला होता बलात्कार
26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता ही मुलगी आजोबांसाठी विडी खरेदी करण्यासाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी गावातील 25 वर्षीय कमलेश मीना याने मुलीला फूस लावली आणि तिला घरापासून दूर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती रडू लागली तेव्हा त्याने मुलीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यात ती बेशुद्ध पडली.
मुलगी मृत झाल्याचा विचार करून आरोपी तिथून पळून गेला. परंतु ती शुद्धीवर आल्यानंतर घरी पोहचली तेव्हा मुलीच्या आईला तिच्या कपड्यांवर रक्त पाहून आश्चर्य वाटले. त्यानंतर तिला प्रथमोपचार केंद्रात नेण्यात आले. तेथून सामुदायिक आरोग्य केंद्र कोटखवडा येथे रेफर करण्यात आले. हे प्रकरण रात्री साडेदहा वाजता कोटखवडा पोलिसांपर्यंत पोहोचले. यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला जयपूरच्या जयपूरिया हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले.
first time in india fifth day of trial in rape case Jaipur court sentenced criminal to 20 years
महत्त्वाच्या बातम्या
- Jioचे नेटवर्क डाऊन : सकाळी 9.30 पासून Jioच्या नेटवर्कमध्ये समस्या, कॉल आणि इंटरनेट वापरकर्ते त्रस्त
- तालिबानी नेता अनस हक्कानीची महमूद गझनवीच्या कबरीला भेट, सोमनाथ मंदिर विध्वंसाचा केला उल्लेख
- लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप
- कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली