वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर शुक्रवारी गोळीबार झाला. गोळीबाराच्या वेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान कोर्टात हजर होते. द डॉनच्या रिपोर्टनुसार, 30 मिनिटांत अनेक वेळा गोळीबार झाला. उच्च न्यायालयाच्या आजूबाजूच्या इमारतींवर स्नायपर तैनात करण्यात आले होते. वृत्तानुसार, इस्लामाबादचे आयजी उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे त्यांनी पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्याशी चर्चा केली.Firing outside Islamabad High Court, three hours after bail, Imran Khan came out of the court, released the video, claimed this
आयजींसोबत झालेल्या चर्चेनंतर इम्रान खान यांनी एक व्हिडिओ जारी केला. यावेळी त्यांनी मला बळजबरीने कोर्टात डांबून ठेवण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले, “तीन तास झाले. मला तीन तास कोर्टात डांबून ठेवले आहे, मला जाऊ दिले जात नाही. कधी-कधी ते सबबी सांगतात… कोर्टाने मला प्रत्येक प्रकरणात जामीन दिला आहे, हे मी आज संपूर्ण समाजाला सांगत आहे. मी मुक्त आहे त्यानंतरही माझे अपहरण झाले आहे.
ते पुढे म्हणाले, “त्यांना पुन्हा काहीतरी करायचे आहे, संपूर्ण समाजाने सज्ज व्हावे.” न्यायालयाचा निर्णयही पाळला जात नाही. लोकांनी आवाज उठवला पाहिजे. आम्ही मेंढ्या-बकर्या बनत आहोत.” मात्र, इम्रान खान यांनी व्हिडिओ जारी केल्यानंतर काही वेळातच त्यांची कोर्टातून सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे, हा गोळीबार अशा वेळी झाला, जेव्हा इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी इम्रान खान यांना 17 मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले होते. इम्रान खानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून जाण्याची परवानगी मिळाली आहे. येथून ते लाहोरला जाणार आहेत.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर गोळीबार करणारे लोक कोण आहेत, त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यान, इम्रान खान यांनी डीआयजींकडे मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करून पोलीस सतर्क आहेत.
Firing outside Islamabad High Court, three hours after bail, Imran Khan came out of the court, released the video, claimed this
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : जर चित्रपट इतर राज्यांमध्ये शांततेने चालू शकतो, तर बंगालमध्ये बंदी का? – सुप्रीम कोर्टाचा सवाल!
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे खूनप्रकरणी गुन्हा, राजकीय वैमनस्यातून हत्या केल्याचा आईचा आरोप
- परमबीर सिंह यांचं निलंबन राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
- ‘’…म्हणून ‘गिरा तो भी टांग उपर’ ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचे धोरण’’ आशिष शेलारांनी साधला निशाणा!