• Download App
    अर्थमंत्री सीतारामन यांनी पाश्चात्य देशांना दाखवला आरसा, म्हणाल्या- भारतातील मुस्लिम पाकिस्तानपेक्षाही सुखी, म्हणूनच त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्याFinance Minister Sitharaman showed a mirror to Western countries, said - Muslims in India are happier than Pakistan, that's why they have more population than them.

    अर्थमंत्री सीतारामन यांनी पाश्चात्य देशांना दाखवला आरसा, म्हणाल्या- भारतातील मुस्लिम पाकिस्तानपेक्षाही सुखी, म्हणूनच त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताविरोधातील ‘नकारात्मक पाश्चात्य समजूती’वर जोरदार हल्ला चढवला. वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्र्यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, अल्पसंख्याकांसाठी रडणाऱ्या पाकिस्तानपेक्षा भारतात मुस्लिम सुखी आणि सुरक्षित आहेत.Finance Minister Sitharaman showed a mirror to Western countries, said – Muslims in India are happier than Pakistan, that’s why they have more population than them.

    पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (PIIE) कार्यक्रमात बोलताना सीतारामन म्हणाल्या की, भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या वेगाने वाढत आहे.



    जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या भारतात

    सीतारामन म्हणाल्या की, पाश्चिमात्य माध्यमांमध्ये असे म्हटले जाते की सरकार पुरस्कृत कारवायांमुळे भारतात मुस्लिमांचे जगणे कठीण झाले आहे, परंतु हे सर्व निराधार आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, जर अशीच परिस्थिती असती तर भारतात जगात दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या कशी झाली असती?

    भारतातील मुस्लिम प्रगती करत आहेत

    PIIE चे अध्यक्ष अॅडम एस. पोसेन यांनी भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या पाश्चात्य मीडियाच्या अहवालाविषयी विचारले असता, सीतारामन यांनी स्पष्टपणे उत्तर दिले.

    अर्थमंत्री म्हणाल्या की, 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानच्या विपरीत, भारतातील मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत आहे. याचे कारण असे की भारतात प्रत्येक प्रकारचे मुस्लिम आपला व्यवसाय करत आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण दिले जात आहे, फेलोशिप दिली जात आहे.

    पाकिस्तानातही मुस्लिम सुरक्षित नाहीत

    अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानमधील प्रत्येक अल्पसंख्याकांची संख्या कमी होत आहे किंवा कमी केली जात आहे. स्वतःला इस्लामिक देश म्हणून घोषित करूनही तेथील काही मुस्लिम पंथीयांवर हल्ले केले जात आहेत आणि त्यांचा नाश केला जात आहे. शेजारील देशात असुरक्षिततेची भावना प्रत्येकाच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले.

    सीतारामन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचल्या आहेत. त्या दुसऱ्या G20 अर्थमंत्र्यांच्या आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील.

    Finance Minister Sitharaman showed a mirror to Western countries, said – Muslims in India are happier than Pakistan, that’s why they have more population than them.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही