• Download App
    उद्योगक्षेत्राला सहकार्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन|Finance Minister Nirmala Sitharaman assures cooperation to industry

    उद्योगक्षेत्राला सहकार्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन

    पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनामुळे परिणाम झालेल्या उद्योग क्षेत्राला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे.Finance Minister Nirmala Sitharaman assures cooperation to industry


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंतीकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनामुळे परिणाम झालेल्या उद्योग क्षेत्राला सरकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

    उद्योग संघटना फिक्कीसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, उद्योग क्षेत्राने या परिस्थितीवर बारीक नजर ठेवावी, असे आम्हाला वाटते. या कोरोना साथीच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्र सोबत आहेत.



    नवीन लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांसोबत आणखी कोरोना प्रकरणांत चाचणी, ट्रॅक, उपचार, कोविड-१९ प्रोटोकॉल आणि लसीकरणामध्ये पाचपट अधिक धोरण अवलंबले गेले आहे. यामुळे येणाºया काळात दिलासा मिळेल.

    या तिमाहीच्या मूल्यांकनापूर्वी आणखी काही दिवस आधी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक समजून घ्या,असे आवाहन करून सीतारामन म्हणाल्या, कोरोनाच्या सुरूवातीपासूनच हॉस्पिटेलिटी, हवाई वाहतूक, पर्यटन आणि हॉटेल्स यासारख्या क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    त्यामुळे सरकारने आपत्कालीन क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेतही या क्षेत्रांचा समावेश केला आहे. ऑक्सिजनची वैद्यकीय मागणी पूर्ण होताच औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठादेखील सुरू होईल.

    Finance Minister Nirmala Sitharaman assures cooperation to industry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे