• Download App
    विरोधकांच्या बहिष्कारावर माजी नोकरशहांनी केली टीका, लोकशाहीच्या भावनांचा आदर राखण्याचा सल्ला Ex-bureaucrats criticized boycott of opposition, advised to respect democratic sentiments

    विरोधकांच्या बहिष्कारावर माजी नोकरशहांनी केली टीका, लोकशाहीच्या भावनांचा आदर राखण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. वास्तविक, 28 मे रोजी पंतप्रधान मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, असे विरोधी पक्षनेत्यांच्या मत आहे. त्याचबरोबर बहिष्कार टाकल्याबद्दल देशातील 260 हून अधिक प्रतिष्ठित लोकांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.. Ex-bureaucrats criticized boycott of opposition, advised to respect democratic sentiments

    या लोकांनी जारी केले निवेदन

    संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकल्याबद्दल 270 नागरिकांनी विरोधकांचा निषेध केला. यामध्ये 88 निवृत्त नोकरशहा, 100 प्रतिष्ठित नागरिक आणि 82 शिक्षणतज्ज्ञांचा समावेश आहे. या लोकांनी संयुक्त निवेदन जारी करून विरोधकांवर टीका केली आहे. संयुक्त निवेदन जारी करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) माजी संचालक वायसी मोदी, माजी आयएएस अधिकारी आरडी कपूर, गोपाल कृष्ण आणि समीरेंद्र चटर्जी यांच्याशिवाय लिंगया विद्यापीठाचे कुलगुरू अनिल रॉय दुबे यांचा समावेश आहे.

    …हा तर अभिमानास्पद प्रसंग

    निवेदनात म्हटले आहे की, नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा हा समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र विरोधी पक्ष या निमित्ताने राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यांचे पोकळ दावे आणि निराधार युक्तिवाद समजण्याच्या पलीकडे आहेत. या प्रतिष्ठित नागरिकांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करत आहेत आणि त्या आधारे लोक सोहळ्यावर बहिष्कार टाकून लोकशाहीच्या भावना उघडपणे दुखावत आहेत.

    Ex-bureaucrats criticized boycott of opposition, advised to respect democratic sentiments

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न