• Download App
    तृणमूल नेत्या सुजाता मंडल यांना निवडणूक आयोगाची नोटीस, दलितांविरुद्ध केले होते आक्षेपार्ह वक्तव्य । Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits

    तृणमूल नेत्या सुजाता मंडल यांना निवडणूक आयोगाची नोटीस, दलितांविरुद्ध केले होते आक्षेपार्ह वक्तव्य

    TMC leader Sujata Mandal : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचारसभा गाजवल्या. या कारणास्तव अलीकडेच आयोगाने भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निर्बंध घातले होते. निवडणूक आयोगाच्या रोषाची झळ ममता बॅनर्जी ते दिलीप घोष यांनाही बसली.

    भिकाऱ्यांशी केली होती तुलना

    तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांनी काही दिवसांपूर्वी कथितरीत्या अनुसूचित जातीतील लोकांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. याविरुद्ध भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांच्या नेतृत्वात पक्षातील नेत्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने गत सोमसारी अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली आणि निवेदन सोपवून सुजाता मंडल यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.

    Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील